Tag Archives: dr. amol kolhe

कंटेन्मेंट क्षेत्र वगळता चित्रकरणास परवानगी : लोककला, तमाशा कलावंतांचा विचार करणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, निर्मात्यांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते, कलाकार …

Read More »

भाजपा-सेनेतील नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात, पण मुख्यमंत्र्यांमुळे नावे जाहीर करणार नाही दिक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेबांना वंदन करून राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात

नागपुर: प्रतिनिधी राष्ट्रवादी पक्षातील अनेक लोक शिवसेना आणि भाजपात जात आहेत. परंतु सेना – भाजपात गेली तीन – चार वर्षे निवडणूक लढवण्याकरीता काम करणारे लोक दुखावले आहेत. अशी दुखावलेली मंडळी माझ्या संपर्कात असून त्यांची नावे जाहीर करणार नाही. कारण मुख्यमंत्री साम-दाम-दंड भेदाचे सूत्र वापरण्यात माहीर असल्याने त्यांची योग्य वेळी नावे …

Read More »

आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन

उस्मानाबाद – वाशीः प्रतिनिधी ‘अ’ गेला तर ‘ब’ आहे आणि ‘ब’ गेला तर ‘क’ आहे आणि कुणीही पक्ष सोडून गेले तरी आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यामुळे जाणारे खुशाल जावू देत अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी वाशी येथील जाहीर सभेत मांडली. येत्या निवडणुकीत कुणी …

Read More »

त्या घोटाळ्याशी माझा संबध नाही निवडणूका आल्याने आदेश आणि नोटीसा आल्याचा अजित पवारांचा दावा

परभणी- पाथरीः प्रतिनिधी पाच वर्षांत ‘त्या’ बॅंकेत कमिटीच्या मिटींगला गेलो नाही. माझा यत्किंचितही संबंध नाही. निवडणूक सुरु झाली की आलेच आदेश, नोटीस… असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून त्यांची ९ तास चौकशी करण्यात आली. कायदा सर्वांना समान हवा. परंतु ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे हे …

Read More »

शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त, तर गरीबांना गरीब करण्याचे काम सरकार करतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप

वाशिम – कारंजा: प्रतिनिधी रोज महाराष्ट्रात ५ ते ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत. १६ हजार शेतकरी महिला विधवा झाल्या, त्यांचे संसार उध्वस्त होत आले आहेत. गरीबांना गरीब करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. माणसं फोडण्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करत असून कर्नाटकच्या …

Read More »

सरकारला कशाची मस्ती आलीय… कसली शेतकऱ्यांची टिंगल टवाळी लावलीय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

औरंगाबाद – बालानगरः प्रतिनिधी या सरकारला कशाची मस्ती आलीय, शेतकऱ्यांची कसली टिंगल टवाळी सुरु आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी बालानगर येथील जाहीर सभेत केला. पुरग्रस्त भागात भाजपचे मंत्री सेल्फी काढणाऱ्या भाजप मंत्र्याचा आणि सरकारचा भोंगळ कारभारावर अजितदादा पवार यांनी जोरदार आसूड ओढला. शिवस्वराज्य यात्रेच्या दुसर्‍या …

Read More »

डोक्यावरून पाणी गेल्यावर मुख्यमंत्र्यांना लक्षात आले राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांचा उपरोधिक टोला

शिर्डी: प्रतिनिधी राज्यात संकट आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची महाजनादेश यात्रा थांबवायला पाहिजे होती. मात्र त्यांची यात्रा सुरुच असून आम्ही आक्षेप घेतल्यावर त्यांनी एक दिवस बंद ठेवली. जर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वेळीच सुचना द्यायला हव्या होत्या. मात्र डोक्यावरुन पाणी वाहायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आल्याचा उपरोधिक टोला अजितदादा पवार यांनी …

Read More »

१५ हजार ‌शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे सरकारचे अपयश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप

अहमदनगरः प्रतिनिधी राज्यात आतापर्यंत १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे भाजप – शिवसेना सरकारचे अपयश आहे. मात्र राज्यातील सगळ्या जनतेने गुण्यागोविंदाने नांदावे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. हे राज्य सुजलाम सुफलाम कसे होईल याकडे राष्ट्रवादीचे लक्ष असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केली. आज बेकारीने तोंड वर काढले …

Read More »

पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सवाल

पुणे – राजगुरुनगर – खेडः प्रतिनिधी आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला केला. शिवस्वराज्य यात्रेतील दुसरी सभा राजगुरुनगर – खेड येथे पार पडली. …

Read More »

छत्रपतींचा आशीर्वाद घेवून राष्ट्रवादीच्या ‘नव्या स्वराज्याचा नवा लढा’ सुरु खा. डॉ.अमोल कोल्हे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले पूजन

जुन्नरः प्रतिनिधी नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्यासाठी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरुन त्यांचा आशिर्वाद घेवून आज करण्यात आली. ढोलताशांच्या गजर आणि जल्लोषात या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, …

Read More »