बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथील बारसू या गावात सुरु होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते. या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री …
Read More »ठाकरे गटात पुन्हा दोन तट
कोकणातील नियोजित रिफायनरी प्रकल्प नाणार येथे होणार होता. मात्र स्थानिक नागरीकांच्या रेट्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यास विरोध करत फडणवीस सरकारला नाणार येथून तो प्रकल्प रद्द करायला लावला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून रिफायनरी प्रकल्प बारसू येथे करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु झाल्यानंतर उध्दव ठाकरे गटात पुन्हा दोन तट …
Read More »शरद पवार म्हणाले, कुणी सांगितले मी म्हातारा झालोय, तुम्ही काय बघितलंय? कोकणातील लोक आता मुंबईत जात नाही
देशाची आणि राज्याची ज्यांच्याकडे सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. मात्र, ती टाकण्याची त्यांची तयारी दिसत नाही. १९७८ ला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा खेड्यापाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा १५ दिवसात मी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी आली, …
Read More »कोकणात होणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक पेण येथे होणार ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प- उद्योगमंत्री उदय सामंत
जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग यांच्यामध्ये पेण (रायगड) येथील निओ एनर्जी प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून कोकणात सुमारे ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक आहे. पेण येथे ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प उभा राहणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग मंत्री सामंत …
Read More »बाप्पाच्या स्वागतासाठी ST ने १.५० लाख चाकरमानी कोकणकडे होणार रवाना एसटीच्या ३ हजार ४०० गाड्यांचे आरक्षण फुल; १९०० गाड्यांना ग्रुप बुकिंगचे प्राधान्य
कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या बाप्पाच्या स्वागतासाठी सुमारे १.५० लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होणार आहेत. गणेशोत्सवासाठी ST अर्थात एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या उत्स्फर्त प्रतिसादामुळे ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिेंगचे प्राधान्य …
Read More »कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ‘या’ विभागाकडे मिळणार टोल माफीचे पासेस पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री …
Read More »कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून इशारा दिला
हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोंकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती …
Read More »मुंबईसह ‘या’ भागात १०० मिलीपेक्षा जास्त पाऊस, मुख्यमंत्री शिंदेंचे लक्ष एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश
राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ …
Read More »गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या कोकणात ७४ गाड्या, आरक्षण ‘या’ तारखेपासून रेल्वे विभागाने जारी केली माहिती
जून महिना संपूर्ण पावसाविना गेला. तर ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र मागील दोन दिवसांपासून कोकणसह राज्यातील काही भागात पाऊसाने चांगली हजेरी लावलेली दिसत आहे. तशातच पुढील महिन्यात शेवटच्या आठवड्यात गणरायाचे आगमन होत असल्याने मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अडचण होवू नये म्हणून मध्य रेल्वेकडून …
Read More »चाकरमान्यांनो गणपतीसाठी कोकणात जाताय, तर एसटीपण आहे बरं का गणपती उत्सवासाठी कोकणात २५०० जादा गाड्या-परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती
कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा दि. २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २ हजार ५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २५ जून २०२२ पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. …
Read More »
Marathi e-Batmya