Tag Archives: konkan

अजित पवार यांचे कोकणवासियांसाठी थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र, …त्याची चौकशी करा तीन महिने आरक्षण कसे फुल्ल?

बाप्पाच्या श्रद्धेपोटी मुंबईसह आजूबाजूच्या शहरांत स्थायिक असलेले कोकणवासिय गणेशोत्सवात मोठ्या संख्येने गावी जात असतात. त्यासाठी तीन महिने आधीच रेल्वे बुकींग केली जाते. कोकण प्रवाशांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त गाड्याही सोडल्या जातात. परंतु, यावेळेस गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची तिकिटे अवघ्या मिनिटभरात फुल्ल झाल्याने अनेक कोकणवासियांचा हिरमोड झाला. त्यानंतर तिकिट विक्री …

Read More »

राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, युनोस्कोच्या त्या नियमानुसार बारसूत प्रकल्प होऊच शकत नाही जमिनी व्यापारी लोकप्रतिनिधींना अमराठी लोकांना विकू नका

कोकणातील बारसू येथील प्रस्तावित रिफानरीच्या प्रकल्पावरून आज ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांची भेट घेतली. त्यापाठोपाठ या रिफायनरी प्रकल्पावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही कोकणचा दौरा करत रत्नागिरी येथील स्व.प्रमोद महाजन क्रिडा संकुलाच्या मैदानावर जाहिर सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनीही उध्दव ठाकरे यांच्या …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा शिंदे-फडणवीसांना इशारा,…तर महाराष्ट्र पेटवू आपल्याच जनतेचे नुकसान पोहोचवून सरकार विकास करणार असेल तर असा विकास नको

बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलनही करत आहेत. तर पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमध्ये जात येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र …

Read More »

अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे मागणी, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण… काजू उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी सरकारने तातडीने ‘काजू बी’साठी हमीभाव जाहीर करावा;

नैसर्गिक आपत्तीमुळे काजू उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होत असतानाच व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीला योग्य दर मिळत नाही. काजू उत्पादकांचे शोषण थांबविण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणाला चाप लावून ‘काजू बी’साठी १६० रुपयांचा हमी भाव जाहीर करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राव्दारे …

Read More »

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या मध्य रेल्वेकडून कोकण, दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकिटे आरक्षित करण्यासाठी झुंबड उडते. मात्र अनेकांना आरक्षित तिकिटे मिळाली नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करत एकतर प्रवास करावा लागतो किंवा खाजगी वाहनाने अवाच्यासव्वा दराने प्रवास करावा लागतो. त्यावर दरवर्षी प्रमाणे यंदाही उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपल्या इच्छितस्थळी जाता यावे यासाठी सुट्टीचा आनंद घेता …

Read More »

अंबादास दानवे यांचा सवाल, हे सरकार अदानीसाठी की सर्वसामान्यांसाठी ? राज्यात कायदा सुव्यस्था राखण्यास सरकार अपयशी-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

कोकणात अदानीला कंपनीला जमीन देण्यासाठी बेकायदेशीर रित्या जमिनीची खरेदी विक्री सुरू आहे. संगमनेर येथे बोगस व्यवहार सुरू असून मूळ मालकाची परवानगी न घेता हे व्यवहार केले जातात. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. विरोधकांवर ईडी सीबीआयची चौकशी लागते, याप्रकरणीही तपास करण्याची मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. हे …

Read More »

तिल्लोरी कुणबी जात प्रमाणपत्राबाबत मंत्री अतुल सावे यांचे विधानसभेत आश्वासन १५ दिवसात बैठक घेऊन निर्णय घेणार

विद्यार्थ्यांना नोकरी आणि शिक्षणासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र वेळेत सादर करणे आवश्यक असते. तिल्लोरी कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे प्रमाणपत्र वेळेत दिले जाण्याबाबतची सूचना संबंधित जिल्हाधिकारी यांना करण्यात येईल आणि येत्या १५ दिवसात याबाबत विस्तृत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले. कोकणातील तिल्लोरी कुणबी समाजाच्या लोकांना …

Read More »

एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना इशारा देत कोकण विकासासाठी केल्या या घोषणा मर्यादा सोडण्याची वेळ आणू नका

दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. …

Read More »

साई रिसॉर्टप्रकरणी रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीकडून १५ मार्चपर्यंत कोठडी किरीट सोमय्या यांचे अनिल परबांना बॅग भरून राहण्याचे आव्हान

कोकणातील साई रिसॉर्टप्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री तथा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच याप्रकरणात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधु सदानंद कदम यांनी परब यांना मदत केल्याचा आरोपही करण्यात आला. अखेर ईडीने शुक्रवारी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद …

Read More »

आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय आज उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. आंबा उत्पादकांना हमीभाव देण्याबरोबरच विविध मागण्या या बोर्डाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी समिती नेमून या समितीवर दोन बागायतदार प्रतिनिधी नेमण्याचाही निर्णय …

Read More »