निष्ठावान म्हणून शिवसेना उबाठा पक्षात ओळखल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मागील काही काळात वादग्रस्त विधाने केली आहेत. तसेच उपसभापती पदावर कायम राहता यावे यासाठी शिवसेना उबाठा पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची आमदारकी धोक्यात आली. मात्र त्यांच्या अपात्रतेसंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, शेतकरी विरोधी, विसंवादी सरकार म्हणून चहापानावर बहिष्कार मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक आक्रमक
सरकार हे शेतकरी विरोधी असून तीन बाजूला तीन तोंड असणारे हे विसंवादी सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्यामुळे आणि सत्ताधारी पक्ष सातत्याने विरोधी पक्षाला सापत्निकतेची वागणूक देत असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याचे विरोधी …
Read More »ईडी नोटीसीवर पहिल्यांदा भाष्य करत राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा ईव्हीएम मशिन्सवर व्यक्त केली शंका
काही महिन्यांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस आली होती. मात्र आता पर्यंत त्या नोटीसीबाबत राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकवेळा बोलण्याचे टाळले होते. मात्र आज पहिल्यांदाच मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पहिल्यांच बोलताना म्हणाले की, मलाही ईडीची नोटीस आली. त्यानंतर मी त्याच्या त्यांच्यासमोर गेलो. बरं ती नोटीस कशाबद्दल …
Read More »पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती, मविआच्या १०० उमेदवारांची न्यायालयात याचिका लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले याचे पुरावे द्या: प्रविण चक्रवर्ती
लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ लाख मतदार अधिक वाढले …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक राज्याबद्दल आपण जास्त काही न बोलेलं बरं
राज्यातील कायदा व सुव्यवस्था चिंताजनक आहे. ज्या राज्यात मंत्री असणारीच लोक जाळपोळ करण्यासाठी रस्त्यावर लोकं उतरवतात. पालकमंत्री पदासाठी राज्यात जाळपोळ होते. अशा राज्याबद्दल आपण जास्त काही न बोलेलं बर आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई प्रसार …
Read More »विजय वडेट्टीवार यांची भूमिका, आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू अन्यथा… स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीवरून संजय राऊत यांच्या मतानंतर पुन्हा व्यक्त केली भूमिका
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई ते महानगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याचा निर्णय शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहिर केला. त्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांनीही यासंदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, कदाचित ते त्यांचे स्वतःचे …
Read More »संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले, स्वबळावर लढविणार कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने आघाडीतून नव्हे तर स्वबळावर निवडणूका
नुकतीच आमचे नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली. त्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या अनुषंगाने चर्चा झाली. त्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्पष्ट संकेत दिले की, कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून आगामी निवडणूका स्वबळावर लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याची स्पष्टोक्ती शिवसेना उबाठाचे प्रवक्ते तथा नेते …
Read More »२०२४ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडलं? परिणाम… हिंदूत्व राजकारणाचा पाया पक्का? ईव्हीएमवर शंका
पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारण आता पुन्हा एकदा धार्मिक आणि अधांदूंध अशा स्वैर आणि राजकिय नेते केंद्रीत राजकारण होताना दिसत आहे. यापूर्वी राजकारणात राजकिय पक्षाचे विचार आणि धार्मिक राजकारणाऐवजी पुरोगामीत्व जपणाऱ्या राजकारणाला जनतेची आणि राजकिय नेत्यांची पसंती होती. मात्र आता राजकिय नेत्यांच्या पसंतीनुसार आणि राजकिय पक्षाच्या विचारधारेनुसार डुलणाऱ्यांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणावर …
Read More »आठवडाभराच्या अधिवेशनात एकूण १९ पैकी १७ विधेयके महायुतीकडून मंजूर विधेयके मंजूर करण्यात महायुतीचा रेकॉर्ड ब्रेक
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर ज्या पद्धतीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांचा सपाटा आणि निर्णयांचा वरवा ज्या पद्धतीने सुरु करण्यात आला होता. अगदी त्याच धर्तीवर आठवडा भराच्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने आणि अल्पसंख्य असलेल्या विरोधकाच्या जोरावर १९ पैकी १७ विधेयके मंजूर करून दाखवित एक नवा रेकॉर्ड ब्रेकच केला असल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल साधणार पिक विमा कंपन्यांच्या गैर प्रकरांची सखोल चौकशी
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगीक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार असून मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली स्टील सिटी म्हणून उदयास येत असून येत्या …
Read More »
Marathi e-Batmya