मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांकरीता झालेल्या निवडणूकांत मध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मतदारसंघातील जागा राखता आल्या नाहीत. त्यामुळे या दोन नेत्यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पुणे पदवीधर मतदारसंघातील एक जागा भाजपाकडे होती. मागील काही वर्षापासून या मतदारसंघातून …
Read More »धुळे-नंदुरबार वगळता ५ जांगावर आघाडीची आघाडी अमरीश पटेलांचा एकतर्फी विजय
मुंबई: प्रतिनिधी विधानपरिषदेच्या एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी तसेच ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबरला मतदान झाले. सकाळपासून सुरु झालेल्या मतमोजणीत धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत भाजपाचे अमरीश पटेल हे विजयी झाले. तर बाकिच्या ५ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे संध्याकाळी दिसून आले. सुरूवातीला पुणे, औरंगाबाद, नागपूर …
Read More »चर्चेपासून पळ काढण्यापेक्षा दोन आठवड्यांचे अधिवेशन घ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांचे, अनेक समाजाच्या समस्या, मराठा समाजाच्या समस्यांवर चर्चा होणे आवश्यक असताना सरकार केवळ दोन दिवसाचे अधिवेशन घेवून अधिवेशनातील चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका करत दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याऐवजी दोन आठवड्यांचे घ्या अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत …
Read More »शेतकऱ्यांच्या लोकचळवळीची चौकशी करणारे निर्लज्ज सरकार! आरे कारशेडप्रमाणेच यातही सत्यच बाहेर येईल : केशव उपाध्ये
मुंबई : प्रतिनिधी स्थगिती, चौकशी, दमनकारी नीती याच्या बाहेर न निघालेल्या सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार? महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत निष्क्रिय सरकारने आता आणखी एका चौकशीची घोषणा करून शेतकर्यांच्या लोकचळवळीचा एकप्रकारे अपमानच केला आहे. तथापि सरकारने हवी ती चौकशी करावी, त्यातून सत्यच बाहेर येईल, असे भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी …
Read More »केवळ सत्ता टिकविण्यासाठी वर्षभर महाविकास आघाडीची धडपड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका
पुणे : प्रतिनिधी राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने गेले वर्षभर केवळ सत्ता टिकविण्यासाठी धडपड केली. पूर्णपणे अपयशी ठरलेल्या या सरकारमुळे राज्यातील सर्वसामान्य माणूस भरडला गेला, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुणे येथे केली. महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षातील अपयशाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते …
Read More »केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मात्र विरोधकांना धमकाविण्यासाठी ईडीचा वापर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असताना केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे होते. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून महाविकास आघाडी सरकारने तातडीने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु केंद्राने अजूनही मदत केलेली नाही. दोन महिने झाले तरी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी …
Read More »शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात आघाडीतील सहयोगी पक्षांकडून भाजपावर टीकेचा सूर
मुंबईः प्रतिनिधी आर्किटेक्चर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सातत्याने आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाडी टाकत सरनाईक यांचे सुपुत्र विहंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. नाईक प्रकरणात सरनाईक यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यामुळे या प्रकरणाची बंद झालेली फाईल राज्य सरकारने पुन्हा उघडली. तसेच पुढील …
Read More »भाजपाच्या विरोधाची वर्षपूर्ती महाराष्ट्र विरोधी राजकारण करण्यात भाजपा यशस्वी होतेय ?
देशात आणि राज्यात वारंवार काँग्रेसची सत्ता येत असताना काँग्रेसेतर पक्षांना मिळणारी मते आणि त्यांना मिळणाऱ्या निवडणूकीतील जागांमुळे असं म्हटलं जायचं कि, लोकशाहीत जर सर्व काँग्रेस विरोधी पक्ष आले तर काँग्रेस कधीच सत्तेत येणार नाही आणि विरोधकच वर्षानुवर्षे सत्तेत राहीतील. या म्हणण्यातील सत्यता महाराष्ट्रात उतरली. परंतु ती काँग्रेसबाबतीत नाही तर काँग्रेसचा …
Read More »धार्मिकस्थळे उघडण्याच्या निर्णयास भाजपाची आंदोलने आणि भक्तांची श्रध्दा कारणीभूत सरकारची परवानगी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली असली तरी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगितले. मंदिरांमध्ये दर्शन घेताना भाविकांनी कोरोनाविषयी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनःश्च …
Read More »दिल्लीबरोबरील संघर्षात राज्याची स्वायतत्ता टिकविण्यासाठी ठाकरे सरकारने काढले हे आदेश सी.बी.आय. चौकशीसाठी आता राज्य सरकारची पूर्व संमती घेणे आवश्यक- गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस आणि राज्याची स्वायतत्ता राखण्यासाठी ठाकरे सरकारने १९८९ साली केंद्राला दिलेली परवानगी आदेश रद्द करत आता राज्यातील कोणत्याही गुन्हे अथवा प्रकरणात चौकशी करायचे असेल राज्य सरकारची परवानगी घेणे सीबीआयला बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात यापुढे आता सी.बी.आय.चौकशीसाठी राज्य सरकारची पूर्व संमती घेणे आवश्यक असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी …
Read More »
Marathi e-Batmya