Tag Archives: mahayuti

अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प शपथविधीच्या वेळी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी नाही

महायुती सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा या सरकारने त्यांच्या निवडणूकीच्या जाहिरानाम्यात केली होती. त्यानंतर सरकारच्या शपथविधीवेळी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, महायुतीने जनतेला फसवल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट सराकरने शेतकरी, लाडक्या बहिणी, बेरोजगारांना फसवले

महायुती सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणताही दिलासा नाही. महायुतीने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे महायुतीने जनतेला फसवल्याचे स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली. अर्थसंकल्पावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीने राज्याची अधोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातूनच …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अवमान करा आणि पुरस्कार व संरक्षण घ्या! राज्य सरकारचे धोरण महिलांवरील बलात्कार सरकारचे अपयश, गृह विभागाचा कारभार घाशीराम कोतवालाच्या हातात असल्याचे द्योतक

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विचारांची मंडळी आज केंद्र आणि राज्यात सत्तेत आहेत. शिवाजी महाराजांना छळले तो विचार आजही जिवंत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान  करणाऱ्या मंडळींच्या मागे राजाश्रय आहे म्हणूनच महाराजांचा अवमान करणाऱ्यांना संरक्षण व पुरस्कार दिले जात आहेत ही अत्यंत खेदाची बाब …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, राहुल गांधी, सुनिल केदार आणि माणिकराव कोकाटेंना वेगवेगळा न्याय का? कोकाटेंची आमदारकी तात्काळ रद्द करा

भारतीय जनता पक्ष लोकशाही व संविधानाला डावलून काम करत आहे. स्वतःला एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय अशी भाजपाची लोकशाहीविरोधी भूमिका आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी व सुनील केदार यांच्या बाबतीत जो न्याय लागू केला गेला तोच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत लागू केला पाहिजे. न्यायालयाने दोषी ठरवल्याने माणिकराव कोकाटे …

Read More »

राज ठाकरे- मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, एकनाथ शिंदे यांनी नियोजित बैठका केल्या रद्द अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठका आणि एमएसआरडीची आढावा बैठका पुढे ढकलल्या

मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून धुसफुस सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकिय सौख्य काही राहिल्याचे दिसून येत नसल्याची कुजबुज सध्या सुरु असतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून महायुतीतील शिवसेना …

Read More »

सुप्रिया सुळे यांची भीती, राज्यात प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती संसदेत मांडणार हा विषय मांडणार

राज्यातील सरकार कबुली देतंय की ४०० कोटी रुपयांचा पीक विम्याचा घोटाळा झाला आहे आणि त्याच सरकारमधील आमदार म्हणतायत की ४०० नव्हे तर ५००० कोटीचा झालाय. हा खूप गंभीर विषय असून तो मी, संसदेत मांडणार आहे. तसेच सरकारने हार्वेस्टरमागे ८ लाख रुपये मागितले हे अतिशय गंभीर आहे स्वतः भ्रष्टाचार होतो हे …

Read More »

२०२४ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडलं? परिणाम… हिंदूत्व राजकारणाचा पाया पक्का? ईव्हीएमवर शंका

पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारण आता पुन्हा एकदा धार्मिक आणि अधांदूंध अशा स्वैर आणि राजकिय नेते केंद्रीत राजकारण होताना दिसत आहे. यापूर्वी राजकारणात राजकिय पक्षाचे विचार आणि धार्मिक राजकारणाऐवजी पुरोगामीत्व जपणाऱ्या राजकारणाला जनतेची आणि राजकिय नेत्यांची पसंती होती. मात्र आता राजकिय नेत्यांच्या पसंतीनुसार आणि राजकिय पक्षाच्या विचारधारेनुसार डुलणाऱ्यांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणावर …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत महायुती? चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत स्थानिक नेतृत्वच घेणार निर्णय

लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्यानंतर महायुतीने विधानसभा निवडणूकांची तयारी जोरात सुरु केली. तसेच महिला मतदारांना आकर्षित करणाऱ्या विविध योजनाही यावेळी जाहिर केल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देणाऱ्या मासिक हप्त्यातही वाढ करत शेतकऱ्यांची फार काळजी करत असल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विधानसभा निवडणूकीत भाजपा आणि महायुतीच्या विरोधात वातावरण असतानाही भाजपा महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या …

Read More »

मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे वाटपः मंत्री कोणत्या दालनात बसणार मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत आणि विस्तारीत कोणत्या इमारती हे मंत्री बसणार

राज्य मंत्रिमंडळातील बिन खात्याच्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाल्यानंतर वास्तविक पाहता राज्यातील जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मंत्री झालेल्या आमदारांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. मात्र या आमदारांना बसणार कोठे याची चिंता फारशी सतावत नव्हती. मात्र अखेर सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्र्यांना बसावयाच्या दालना संदर्भात शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयानुसार महसूल मंत्री …

Read More »

महायुतीतील मंत्र्याची खाती जाहिरः जाणून घ्या कोणाकडे कोणतं खातं अधिवेशन संपल्यानंतर खाते वाटप जाहिर

अनेक बैठका आणि जोरदार वाटाघाटीनंतर महायुतीने शनिवारी संध्याकाळी आपल्या मंत्र्यांसाठी कॅबिनेट विभागांची घोषणा केली. गृहमंत्रालय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्कसह वित्त आणि नियोजन खाते …

Read More »