मनोज जरांगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करत असताना, ही भाषा सुसंस्कृत आणि समंजस असलेल्या मराठा समाजाला शोभणारी नाही, हे लक्षात घ्यावे. मनोज जरांगे यांच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. मराठा समाजाची ही भाषा नव्हे. त्यामुळे आरक्षणाचा लढा …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची मागणी, हेक्टरी ७० हजार आणि शेतीला नोकरीचा दर्जा द्या बीडच्या नारायण गडावरून पहिल्याच दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांची मागणीही आणि इशारा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्यानंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील नारायण गडावर पहिलाच दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. तसेच या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यासाठी लढाही पुकारला आहे. मनोज जरांगे …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यात अशांतता मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही ओबीसीबाबतच्या भूमिकेवरून टीका
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या अलिकडच्या सरकारी निर्णयामुळे ओबीसींच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी करत समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि राज्यात, विशेषतः मराठवाड्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचाही विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, मराठा समाजाबाबतचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्न नाही ओबीसी जात प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरु
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ उपसमितीने अतिशय विचार करुन निर्णय केले आहेत.त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे शासन निर्णय मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही.निर्णयाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचा काही गैरसमज असेल, तर त्यांची भेट घेवून दूर करु. उपसमितीने चर्चेची दार सर्वासाठी खुली ठेवली आहेत. राज्यातील सामाजिक ऐक्य कायम रहावे …
Read More »मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्यावर टीका यापुढेही मराठा समाजासाठी काम करतच राहणार
मागील पाच दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले होते. तसेच मागील तीन-चार वेळेप्रमाणे राज्य सरकार ठोस निर्णय न घेता मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणार का अशी चर्चा सुरु होती. मात्र राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नुसत्याच ऐकून नाही घेतल्या तर …
Read More »अजित पवार म्हणाले की, मराठा समाजासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील
“मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने पहिल्या दिवसापासून सकारात्मक व संवेदनशील भूमिका घेतली होती. आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने सतत प्रयत्न केले. त्या अनुषंगाने मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशींवर तातडीने निर्णय घेऊन आज शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुढे बोलताना …
Read More »मराठवाड्यात कुणबी-मराठा किंवा मराठा- कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहिर
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या लढ्याला आज अखेर यश मिळाले. निझाम राजवटीच्या अखत्यारित असलेल्या मराठवाडयातील मराठा समाजाला कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी असे जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाच्या मागणीनुसार अखेर राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार निझाम …
Read More »न्यायालयाच्या निकालावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, गाड्या मैदानावर लावा, मैदानातच बसा न्यायालयाच्या निकाल पाळणार
मला माझ्या जातीला आणि जातीच्या लेकरांना मोठे करायचे आहे. त्यासाठी मी एवढे कष्ट सहन करतोय. त्यामुळे कोणीही आंदोलनात गोंधळ घालू नका. न्यायालयाने दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करा. रस्त्यांवरील गाड्या हटवून पार्किंगमध्ये लावा, तिथेच झोपा आणि बाहेर निघायचे असेल तेंव्हा आझाद मैदानावर या. परंतु कोणत्याही परिस्थितीत मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका …
Read More »मराठा आरक्षण आंदोलनाचा धसका सत्ताधारी मंत्री आणि राजकीय पक्षांचे कार्यालयांना टाळे मंत्र्याचे बंगले आणि राजकीय पक्षांची कार्यालये बंद, मंत्रालयाच्या भोवती सुरक्षा कर्मचारी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी अनेक मराठा आंदोलकांनी मंत्रालयाच्या समोरील चौकात एकत्र येत सरकारच्या विरोधात आंदोलन केले. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. त्यानंतर मागील तीन दिवसात मंत्रालयासमोरील आणि मंत्र्यांच्या बंगल्यांना आणि पक्षाच्या कार्यालयांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली. तर आज …
Read More »छगन भुजबळ यांचा इशारा, तर आपण सुद्धा मुंबईत धडकू कुणबी आणि मराठा हे वेगळेच आहेत, उच्च न्यायालया सहित सुप्रीम कोर्टाने देखील यावर निकाल दिला
राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. मुंबईमध्ये मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणी साठी आंदोलन करत आहे. मात्र ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिले तर ओबीसी मधल्या लहान लहान जातीचे मोठे नुकसान होईल त्यामुळे स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा असून ओबीसी मधून आरक्षण देण्यास आमचा विरोध कायमच असेल असे …
Read More »
Marathi e-Batmya