Tag Archives: mantralay

आणि मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा करावा लागला मुक्काम कालच्या पावसामुळे सगळीकडेच पाणी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात ४७ वर्षातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस काल पडला. तसेच मंत्रालयातील प्रमुख तीन प्रवेशद्वारावर निसर्गाने अवकृपा दाखविल्याने अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेरच पडता आले नाही. त्यामुळ‌े अखेर या १५ टक्के उपस्थिती राहीलेल्या बहुतांष अधिकारी-कर्मचाऱ्यांना रात्री मंत्रालयातच मुक्काम ठोकावा लागला. काही महिन्यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तिन्ही मार्गावरच्या उपनगरीय रेल्वे …

Read More »

प्रशासनात डॉक्टर सहकारी असल्याचा असाही विभागाला फायदा कर्मचाऱ्यांच्या शरीरातील अॅण्टीबॉ़डी स्टेट करून सुरक्षिततेची घेतली काळजी

मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी पावले उचलण्यात येत आहेत. या विषाणूच्या संसर्गाची लागण स्वत:लाही होवू नये यादृष्टीने अनेकजण पुरेशी काळजी घेत आहेत. तरीही या विषाणूची लागण काही जणांना होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्रालयातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकंडवार यांनी विभागातील …

Read More »

मनिषा म्हैसकर यांच्याकडे पर्यावरण विभागाचा पदभार राज्य सरकारकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी नगरविकास विभागातून राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेल्या सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्याकडे आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्यासह अन्य दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या सह आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलेले आशुतोष सलिल यांची पर्यटन विभागाच्या …

Read More »

आता १५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यास परवानगी राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आर्थिक अडचणी आणि कोरोना विषाणूमुळे बदल्यांच्या प्रक्रियेवर घालण्यात आलेली बंदी आज काही अंशी राज्य सरकारने उठवित एकूण कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के बदलीस मान्यता देण्याचा निर्णय घेतला. तसेच यासंदर्भातील आदेशही आज सामान्य प्रशासनाने जारी केले. शासकिय सेवेत असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दर तीन वर्षाला बदली करण्याचा नियम आहे. त्यानुसार ज्यांचे …

Read More »

मंत्र्यांचा आदेश, प्रस्ताव तयार करा! पण नेमका कशाचा? अधिकारी बुचकळ्यात धारावी, मानखुर्द, गोवंडीचा पुनर्विकास, पण झोपड्यांचा कि इमारतींचा

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील तीन महिने मुंबईतील कोरोना विषाणूचा वाढत्या प्रसारामुळे शहरातील झोपडपट्या आणि कमी आकारांच्या घरांचा प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले. यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांने गृहनिर्माण विभागाला तीन ओळीचे पत्र पाठवित धारावी, मानखुर्द, गोवंडीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यास सांगत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करायचे असल्याचे सांगितले. मात्र त्या तीन ओळीच्या पत्रता …

Read More »

सरकारी सेवानिवृत्तीला १ किंवा वयाच्या ६० वर्षापर्यंत मुदत वाढ शासन निर्णय लवकरच निघणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची परिस्थिती कधी अटोक्यात येईल याचा अंदाज अद्याप तरी राज्य सरकारला येत नाही. त्यामुळे आगामी काळात संभावित कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू नये यासाठी यावर्षी किंवा पुढील वर्षी सेवानिवृत्त होत असलेल्यांना १ वर्षाची मुदतवाढ किंवा वयाच्या ६० व्या सेवानिवृत्ती देण्याविषयी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून यासंदर्भात लवकरच …

Read More »

पूर्ण महिन्याचा पगार पाहिजे तर मंत्रालयात या अन्यथा….. पैसा नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना बिन पगारी रजा देण्याची कामगार विभागाची शिफारस

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यावर आलेल्या कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा गैरअर्थ काढत मंत्रालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी हे नियमानुसार मुख्यालयाला न कळविताच परस्पर गावी जावून बसले आहेत. अशा विना परवानगी गावी गेलेल्यांच्या विरोधात विभागीय चौकशी लावण्याची शिफारस करत मंत्रालयात प्रत्यक्ष राहून काम करणाऱ्यांना पूर्ण महिन्याचे वेतन द्या अन्यथा घरी बसून …

Read More »

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे झाले बाकीच्या ६ विभागाचे काय? कोरोना योध्दे अथवा इतर कमी पडत असलेल्या ठिकाणी या विभागातील अधिकाऱ्यांनाही पाठवा

मुंबई: प्रतिनिधी कोरोना युध्दात सध्या मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांसहित बिगर अत्यावश्यक सेवांमधील कामगार, कर्मचारी तसेच अधिकारी आणि पोलिस दलातील कर्मचारीही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यातील पोलिसांच्या मदतीसाठी मंत्रालयातील १४२१ कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या दिमतीला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र विक्री कर, रेशनिंग ऑफिस, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम …

Read More »

पोलिसांच्या दिमतीला १९ अवर सचिवांची नियुक्ती : डिव्हॅल्युएशन झाल्याची भावना ग्रामविकास विभागातील कर्मचारी का कमी ?

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगारांचा प्रश्न जटील बनत चालला आहे. त्यामुळे या कामगारांना योग्यरित्या त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील १४०० कर्मचारी-अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र यात क्लार्क, टायपिस्ट, असिस्टंट यांच्याबरोबर अवर सचिवांची नियुक्ती करण्यात आल्याने आमचं डिव्हॅल्युएशन केले की काय असा सवाल या नियुक्त अवर सचिवांकडून उपस्थित …

Read More »

मंत्रालयातील १५०० कर्मचारी-अधिकाऱ्यांना नेमले पोलिसांच्या मदतीला ४० वर्षाच्या आतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर, पुणे महानगरातून स्थलांतरीत मजूर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या मजूरांच्या पाठविणीसाठी पोलिस यंत्रणेकडे आणि राज्य सरकारच्या कंट्रोल रूमकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या कामगारांना पाठविण्याच्या कामात अडचणी येत होते. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने अखेर मंत्रालयातील ४० वर्षाच्या आतील १४२१ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. …

Read More »