Breaking News

Tag Archives: maratha reservation

मराठा समाजातील ७२ टक्के नागरीकांचे उत्पन्न ५० हजारापेक्षा कमी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधिमंडळात सादर

मुंबई : प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नावरून सातत्याने मोर्चे, धरणे आंदोलन करण्यात येत होते. तसेच राज्याच्या विधिमंडळातही विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे एक आठवड्याहून अधिक दिवस कामकाजही होवू शकले नाही. अखेर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याविषयीचा कृती अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर विधान …

Read More »

कायद्याचा सोयीस्कर अर्थ काढून मुख्यमंत्र्यांकडून सभागृहाची दिशाभूल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल  विधीमंडळासमोर मांडणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. याबाबतीत कायद्याचा सोयीस्कर अर्थ काढून मा. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना वरील त्यांनी आरोप केला. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम (२००५) …

Read More »

सरकारचा हेतू स्पष्ट नसल्यानेच अहवाल सभागृहात मांडत नाही विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मागील एक आठवड्यापासून राज्य मागासवर्ग आयोग आणि टीसचा अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहवालाच्या शिफारसी सभागृहात ठेवणार असल्याचे जाहीर केले. तर सकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ते एटीआर सभागृहात मांडणार असल्याचे सांगत असल्याने मराठा, धनगर …

Read More »

आरक्षणासंबधीचे दोन्ही अहवाल सादर करा, अन्यथा कामकाज चालू देणार नाही विरोधकांकडून दुसऱ्या आठवड्यातही विधानसभेचे कामकाज तहकूब

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोग आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा धनगर आरक्षणासंदर्भातील अहवाल विधानसभेत मांडण्याची मागणी विरोधकांनी दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा केली. तसेच हे दोन्ही अहवाल सभागृहात मांडल्याशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा दिला. तरीही अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

मराठा आरक्षण द्यायचे असेल तर ५० टक्केपेक्षा जास्तची तरतूद करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा सरकारला सल्ला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात न्यायालयात गेल्यास त्या आरक्षणाचे उलट-सुलट होणार आहे. जर आरक्षण द्यायचे असेल तर ते ५० टक्के पेक्षा जास्त देता येणार नाही. तशी सिलिंग राज्यघटनेने नाही तर सर्वोच्च न्यायालयाने घातली आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर संसदेत जावून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या …

Read More »

मराठा, धनगर आरक्षणाच्या अहवालावरून विधानसभा तिसऱ्या दिवशीही तहकूब अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग आणि टाटा सामाजिक विज्ञान अर्थात टीसचा अहवाल विधानसभेत मांडण्याच्या मागणीवरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच हे दोन्ही अहवाल सभागृहात आजच मांडावा या मागणीवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा …

Read More »

मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी भाजप शिवसेना सरकारच्या दिरंगाईमुळे मराठा आरक्षणासाठी आधीच जवळपास चार वर्ष दिरंगाई झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर कारवाई पूर्ण करून ओबीसी सहित इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता न्यायालयात टिकेल असे  १६ टक्के आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक …

Read More »

अखेर मागास आयोगाच्या अहवालावरून अजित पवार यांची सारवासारव अहवाल सभागृहात मांडण्याने आवश्यकच

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला अहवाल सादर केला. हा अहवाल विधानसभेत ठेवणे आवश्यक असून त्यामाध्यमातून जनतेलाही कळणे आवश्यक आहे. त्यामुळे विधानसभेत यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याची सारवासारव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधानसभेत केलेल्या वक्तव्यामुळे …

Read More »

आम्हाला चर्चा नको…आधी मदत जाहीर करा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नाही…हातचं पीक गेलं…शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल करतानाच शेतकरी आपले सरण रचून आत्महत्या करत आहेत… धनगरांनाही आरक्षण मिळत नाही…आम्हाला सभागृहात चर्चा नकोय…आधी मदत जाहीर करावी आणि मराठा आरक्षण पटलावर आणावे अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली मात्र हा …

Read More »

मराठा आरक्षणाच्या अहवाल मांडण्यावरून विरोधकांमध्ये फूट विखे म्हणतात अहवाल मांडा तर अजित पवार म्हणतात मांडू नका

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे कामकाज सुरु होताच राज्यातील मराठा समाजाला मागास ठरविणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारने सभागृहात आजच मांडावा अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात मांडली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हा अहवाल सभागृहात मांडण्याऐवजी विरोधकांमधील ज्येष्ठ नेते आणि सत्ताधारी यांच्यात चर्चा करून मराठा …

Read More »