मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणूकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचाराच्या निमित्ताने भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सातत्याने प्रचारसभा घेत आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, प्रियंका गांधी वड्रा यांच्या प्रचारसभा होत आहेत. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावेळेचा तेलंगणातील तो व्हिडिओ व्हायरलः काँग्रेसची टीका
तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत माढिगा समाजाच्या आरक्षण वर्गिकरणाच्या मागणीसह तेलंगणाच्या विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते. नेमके त्याच वेळी एका तरूणीने सभास्थळी असलेल्या वीजेच्या खांबावर चढून पंतप्रधान मोदी यांचे खऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, SC मध्ये मादिगा समाजाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार
सध्या पाच राज्यांपैकी एक राज्याच्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर दुसऱ्याबाजूला चार राज्यांमधील निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या चार पैकी तेलगंणा राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारासाठी भाजपाच्या विश्वरूप महासभेला संबोधित करताना राज्यघटनेच्या समितीत दलित अर्थात अनुसूचित जाती (SC) च्या आर्थिक उन्नतीसाठी योग्य त्या सुधारणा करण्यात येणार …
Read More »शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर, कदाचित नीट ब्रीफींग झाले नसावे मोदी सरकारने साखरेची निर्यात बंद केली, आंतरराष्ट्रीय बाजारात जाऊ नये म्हणून निर्यात बंद
दोनच दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. ते शेतकऱ्यांसाठी फार केले अशा पध्दतीने वावरतात. मात्र ते देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी फार काही करू शकले नाहीत असा आरोप शरद पवार यांचे नाव घेता शिर्डी येथील जाहिर कार्यक्रमात केला. त्यावर काल रायगड येथे झालेल्या एका बँकेच्या कार्यक्रमात …
Read More »आदित्य ठाकरे यांचा खोचक टोला, … मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवतील मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपावर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर बोलताना युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपासह राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले , राज्यातील मिंदे यांच्या नेतृत्वाखालील फडणवीस-पवार यांचे सरकार हे तोडून मोडून हे सरकार बनलं आहे. आम्हाला वाटलं हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल. मात्र या सरकारला आमच्यापेक्षा जास्त …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, पंतप्रधान मोदी हे ग्रामपंचायतीचे सरपंच झालेत का ? मोदींच्या दौऱ्यावरून प्रकाश आंबेडकर यांची टीका
एखाद्या गावात कुठेही काहीही झाले तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचास वाटते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाटू लागले आहे असे सांगतानाच पंतप्रधान हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीत काही प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी नरेंद्र मोदी …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा सवाल, महाराष्ट्रातील मोठे नेते, पण शेतकऱ्यांसाठी काय केले अजित पवार यांच्या उपस्थितीतच मोदींचा शरद पवार यांच्याबाबत सवाल
राज्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुमारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आवर्जून उपस्थित होते. …
Read More »सुप्रिया सुळे यांचा आरोप, धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाला भाजपाचा विरोध विद्यमान गृहमंत्री राज्याच्या इतिहासात सर्वाधिक अपयशी गृहमंत्री
मुंबईतील बस बेस्ट कामगारांच्या समस्या संदर्भात प्रतीक्षा नगर येथील बस डेपो मध्ये जाऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेणार आहेत असे सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस बारामतीत येऊन म्हणाले होते की, पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण देऊ. …
Read More »उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, पंतप्रधान मोदी यांनी जरांगे पाटील यांची भेट घ्यावी दिड वर्षे काय करत होतात
मराठा आरक्षणावर आता खूप लोकांनी बोलून गोंधळ घालू नये. नेमकेपणाने तो प्रश्न कसा सुटेल त्यादिशेने विचार करण्याची गरज आङे. कोणालाही काही विचारलेय आणि कोणी काहीही बोलतेय असा त्याचा विचका करू नये नेमकेपणाने काम करून मराठा समाजाला न्याय दिला गेलाच पाहिजे. ती आमचीही मागणी आहे. आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, हिरे उद्योगासह उर्वरित उद्योग गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकील सदावर्तेचा बोलविता धनी कोण?
महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे ‘उद्योग’ मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. वेदांता-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यात विद्यमान भाजपा सरकार कसलीही कमतरता भासू देत नाही. आता मुंबईतील मोठ्या हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन …
Read More »
Marathi e-Batmya