Tag Archives: narendra modi

जयराम रमेश यांचा टोला, राहुल गांधींनी ‘गॅरंटी’ शब्द वापरल्यामुळेच ‘मोदी गॅरंटी’ सुरु

भारत जोडो न्याय यात्राचे पाच न्याय स्तंभ आहेत व १४ जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी न्याय, युवा न्याय, भागिदारी न्याय व महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्या आहेत. पाच गॅरंटीमधून काँग्रेसचा हा २० कलमी कार्यक्रम असून ही गॅरंटी एका व्यक्तीची नाही तर काँग्रेस पक्षाची आहे. राजकीय शब्दकोषात गॅरंटी हा शब्द वापरणारा देशातील पहिली …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची घोषणा, रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार

नवनवीन योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहोत. आज ८५ हजार कोटींहून अधिकचे प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे अहमदाबाद-मुंबई वंदे भारत …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिआरडिओच्या शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन अग्नी- ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अग्नी-५ या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आज ११ मार्च रोजी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी मिशन दिव्यस्त्र अंतर्गत स्वदेशी विकसित केल्याबद्दल अभिनंदन केले. शास्त्रज्ञांनी मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानाची चाचणी केली. मिशन दिव्यस्त्राच्या चाचणीसह, भारत MIRV क्षमता असलेल्या निवडक राष्ट्रांच्या गटात सामील झाला आहे. पंतप्रधान …

Read More »

ईशान्य मुंबईतून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहिर

एक-दोन वर्षापूर्वी ईडीच्या नोटीसा आणि भाजपाचा वाढता दबाव यामुळे शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेतील एक मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला. तसेच मुंबईतील अनेक खासदारही शिंदे यांच्यासोबत गेले. त्यात ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटाची वाट धरली. मात्र आता लोकसभा निवडणूकीला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असून …

Read More »

पुणे विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनलचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. या नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर पुणे विमानतळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे ९ हजार ८०० कोटींहून अधिक खर्चाचे १५ विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता. या नवीन टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे झाले. या कार्यक्रमांतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या या नवीन इमारतीची पाहणी करून हे विमानतळ …

Read More »

मुंबई भाजपाकडून सहा डिजिटल प्रचार रथाचे उद्घाटन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाने प्रचारात आघाडी घेतली असून मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते आज सहा डिजिटल प्रचार रथाला झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. दादर येथील मुंबई भाजपा कार्यालयाच्या आवारात प्रचार रथ शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डिजिटल प्रचार रथाच्या माध्यमातून मुंबईतील सहाही लोकसभा क्षेत्रातील …

Read More »

राज ठाकरे मनसैनिकांना म्हणाले, वडा टाकला की तळूनच बाहेर आला पाहिजे …

राज्यात खऱ्या अर्थाने फक्त तीनच राजकिय पक्ष स्थापन झाले. पहिला जनसंघ दुसरी शिवसेना आणि तिसरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आज जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश दिसतय ना ते यश काही आजचे नाही. त्यांचा सर्वात आधी पहिला पहिला पक्ष स्थापन झाला तो जनसंघ आणि त्यानंतरचा भाजपा. पण आज जे काही …

Read More »

अरूणाचलमधील तवांगला जोडणाऱ्या सर्वाधिक लांब बोगद्याचे उद्घाटन

ईशान्य भारतातील ७ राज्यांतील विविध विकास अशा ₹५५,६०० कोटी रूपये किमतीच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुमारंभ करण्यात आला. त्याचबरोबर अरूणाचल प्रदेश मधील तवांग प्रदेशाला जोडणाऱ्या सामरिक सेला बोगद्याचा समावेश आहे. इटानगर येथून मणिपूर, मेगालय नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरूणाचल प्रदेशातील विविध विकासांचा शुमारंभ केला. सुमारे ₹८२५ कोटी खर्चून …

Read More »

हाच तुमचा नवीन भारत आहे का? मुस्लिमांसोबतच्या त्या व्हिडिओवर संताप

राजधानी दिल्ली येथील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये मुस्लिम बांधव नमाज पठण करत असून, त्यांना पोलीस लाथांनी मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले …

Read More »