Tag Archives: ncp

छगन भुजबळ यांची मागणी, सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लेखन लिहिणाऱ्यांवर कारवाई करा छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘इंडिक टेल्स’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर …

Read More »

शरद पवार यांनी मच्छिमार महिलांना दिले ‘हे’ आश्वासन तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या काळात तुमच्या पाठिशी उभे राहणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी प्रयत्न करणारा, त्यांचे सुख-दुःख समजून घेणारा, प्रसंगी अडचणीत मदत करणारा पक्ष आहे. त्यामुळे साहजिकच तुम्ही सर्वजण आणि सहकारी करत असलेल्या कष्टांची नोंद घेतल्यानंतर तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या काळात तुमच्या पाठिशी उभे राहणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा दावा,… तर मविआच्या २०० पेक्षा कमी जागा येणार नाहीत कर्नाटकचा फॉर्मुला महाराष्ट्रातही राबविणार

महाविकास आघाडी सरकार पाडून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. परिणामी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर, शिंदे- फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध करून सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या. त्यातच राज्यातील सत्ता हस्तगत केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीच्या आमदार-खासदारांसोबत सापत्नपणाची वागणूक द्यायला सुरुवात केली. …

Read More »

रोहित पवार यांचा त्या कार्यक्रमावरून सवाल, बोलघेवडे चॉकलेट बॉय आता गप्प का? सावरकरांसाठी राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविले

देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन होत असतानाच भारतातील १९ राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. त्यामुळे देशातील विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील स्वातंत्र्यवीर सावरकर जंयतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आल्याने राज्यातील काँग्रेससह राष्ट्र्वादी काँग्रेसने केंद्र सरकारवर आणि …

Read More »

पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी म्हणाल्या, शरद पवारांना सांगूनच….. भाजपाने आश्वासन पाळले नाही म्हणून आम्ही परतलो

उल्हासनगरमधील बलाढ्य कलानी परिवार मध्यंतरी अडीच ते तीन वर्षांच्या काळासाठी भाजपात गेला होता. मात्र भाजपचा दबाव असल्यानं आपण जाताना शरद पवार साहेबांची परवानगी घेऊनच गेलो होतो. असा खुलासा आता पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम कलानी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकेकाळचा डॉन आणि उल्हासनगरचे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा पलटवार,….तर जनताच जमालगोटा देईल स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त

दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना साधे निमंत्रणही न दिल्याच्या विरोधात विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तरीही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »

शरद पवार यांची पंतप्रधान मोदींवर टीका, …चिंता वाटायला लागली नेहरूंची विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना

राजधानी दिल्लीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने मंजुरी दिलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. या उद्घाटनादरम्यान वैदिक पध्दतीन संसदेच्या परिसरात हवन करण्याबरोबरच अनेक साधू-संताचा वावर संसदेत पाह्यला मिळाला. तसेच ‘सेंगोल’ची लोकसभेत स्थापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर टाकलेल्या बहिष्काराची …

Read More »

संसदेच्या उद्घाटनाला हजर राहणार की नाही शरद पवार यांनी केलं स्पष्ट… विश्वासात घेऊन निर्णयच घ्यायचा नसेल तर उद्धाटनाला जाऊ नये

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून वाद रंगला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला निमंत्रण नसल्याने विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षाने उद्घाटन सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशात शनिवारी २७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसद भवन बांधताना विश्वास न घेतल्याचा आरोप …

Read More »

नीती आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,… त्यांच्या राज्याचं नुकसान मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक घेतले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या शनिवारी २७ मे रोजी झालेल्या बैठकीला तब्बल १० मुख्यमंत्री गैरहजर राहिले. यापैकी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भूमिका जाहिर करत बैठकीवर बहिष्कार टाकला. आता नीती आयोगाच्या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या …

Read More »

भेटीनंतर शरद पवार यांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन,…काळाची गरज राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करणार

देशातील लोकशाही वाचवण्यासाठी भाजपाविरुध्द सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. दिल्लीतील आप सरकारविरोधातील विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिले. अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान व आपच्या …

Read More »