सध्या सभागृहात गलिच्छपणाचे कामकाज सुरू आहे…अक्षरशः यांना कुणालाही विधीमंडळाच्या कामकाजात रस नाहीय… यांना बाकीच्याच कामात रस आहे. निर्लज्जपणाचा कळस झाल्यावर आमचा नाईलाज होतो अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात तीव्र संताप व्यक्त केला. तसेच आज सकाळी सभागृहात मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री उपस्थित राहिले नसल्याने विरोधी पक्षनेते …
Read More »अजित पवार म्हणाले, रखरखत्या उन्हात २० हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर… आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडविण्याची मागणी
भारतीय किसान सभेच्यावतीने लाँगमार्च सुरु करण्यात आला असून दिंडोरीहून आंदोलक शेतकरी रखरखत्या उन्हातून चालत मुंबईच्या वेशीवर आले आहेत. त्यांच्याबरोबरची मुख्यमंत्र्यांची बैठक आज रद्द करण्यात आली आहे, तरी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह …
Read More »मुख्यमंत्री तुमच्या मित्राचा ग्रोथ रेट…असे म्हणत जयंत पाटील यांनी फडणवीसांच्या हसण्यावर काढला चिमटा तुम इतका क्यों मुस्करा रहे हो या ओळी आता तुम्हा बघितल्या की आठवतात
विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडताना भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मित्र तथा मित्रा या शासकिय समितीचे अध्यक्ष अजय अशर यांच्यावरून टोला लागवताना म्हणाले, अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे सध्या राज्याचा ग्रोथ रेट ६.८ असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा ग्रोथ रेट वाढविण्यासाठी तुम्ही तुमचे …
Read More »कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन, पीक विम्याची थकीत ५०३ कोटी रक्कम १५ दिवसांत ५० लाख, ९८ हजार ९९ शेतकऱ्यांना २ कोटी ३५६ लाख भरपाई
पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई देत असून उर्वरित ५०३ कोटी रुपयांची रक्कम पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली. तसेच केवळ एक रुपयांत पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे, हा राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी विरोधकांच्या …
Read More »छगन भुजबळांनी धरले धारेवर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषीमंत्र्यांकडून… अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही ; छगन भुजबळ यांच्यासह महाविकास आघाडीचा सभात्याग
राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असताना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करून देखील सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषीमंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या …
Read More »जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला, काल पंतप्रधानच बदलले आता ते माझे गटनेता पदही धोक्यात… मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत असे वाटते...
विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आणि प्रतोद हे पद रिक्त असून या पदावर एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे गटनेते आणि अनिकेत तटकरे यांची पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली अशी माहिती देण्यात आली. ही माहिती अजूनही अधिकृत संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे ही गंभीर चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …
Read More »शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या कृषीमंत्री सत्तारांच्या विरोधातील आंदोलनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा? अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी …
Read More »शरद पवारांनी सांगितला किस्सा, चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या आईने ‘गावच्या तहसीलदारापेक्षा…’ अझीम प्रेमजी यांनी चव्हाण सेंटरचा सन्मान स्वीकारल्याबद्दल आणि सन्मानाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल शरद पवारानी व्यक्त केली कृतज्ञता...
आज या देशात आणि राज्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही ख-या अर्थाने जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अद्यापही पूर्णत्वाला गेली असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जग, जंगल आणि …
Read More »मुश्रीफांवरील ईडी कारवाईवर प्रफुल पटेल मोजक्या शब्दात म्हणाले, मला माहिती नाही पण मुश्रीफ… प्रफुल पटेल यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार अद्यापही लटकतीच
केद्रांत भाजपाचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी वरळी येथील एका मालमत्ता खरेदी प्रकरणी ईडीने कारवाई सुरु केली. तसेच या तपासात अद्याप काय सापडले काय नाही याबाबतची माहिती अधिकृतरित्या अद्याप पुढे आली नाही. मात्र त्यांचे पक्षातील सहयोगी तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दिड महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई …
Read More »धनंजय मुंडेंचे बहिण पंकजा मुंडेंना ओपन चँलेंज, मी एमआयडीसी आणली आता तुम्ही… मी फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही
राज्यातील मुंडे बंधू-भगिनीमधील वाद निवडणूकीच्या तोंडावर सातत्याने उफाळून येत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. तर कधी कधी आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा त्यांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावाही राज्यातील जनतेला पाह्यला मिळाला आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंडे बहिण भावातील संघर्ष पुन्हा एकदा पाह्यला …
Read More »
Marathi e-Batmya