जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तब्बल १८ ठिकाणी विजय मिळवला आहे. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने हा भव्य विजय मिळवल्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर जयंतराव पाटील यांचेच वर्चस्व कायम …
Read More »नागपंचमीला जिवंत नागाची पुजा करण्यास परवानगी द्या-आमदारांची विधानसभेत मागणी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी केली मागणी
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील जागतिक कीर्तीच्या नागपंचमी सणात जिवंत नागाची पूजा करण्यास शासनाने बंदी घातली होती. त्यावरून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तसेच गुरू गोरक्षनाथांनी सुरू केलेल्या या प्रथेवर शासनाने बंदी घातली. त्यामुळे मातीचे नाग बनविण्यात येऊन त्याची पुजा केली जाते असे सांगत ,सर्वपक्षीय आमदारांनी नागपंचमी सणाला जिवंत नागाची पुजा करण्याची …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण, निवारा केंद्रांमध्ये सुविधा द्या 'अलमट्टी'तील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करा
कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी …
Read More »महाराष्ट्रातील काँग्रेस लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहिर ?
राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा निवडणूकांची यादी जाहिर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने संभाव्य लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. तर काँग्रेसकडून १२ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी …
Read More »शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळ विकासासाठी १३ कोटींचा निधी
स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशा सांगली तालुक्यातील शिराळा येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यास राज्य शासनाच्या शिखर समितीची मान्यता मिळाली असून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने त्यासाठी १३ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला आहे. …
Read More »महाराष्ट्रातील पूरव्यवस्थापन प्रकल्प जागतिक बँकेच्या पैशातून पूर्ण होणार
मागील चार ते पाच वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना पावसाळ्याच्या कालावधीत नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे या भागातील नद्यांना येणारे अतिरिक्त पाणी नाईलास्तव कर्नाटकला सोडावे लागते. या अनुषंगाने राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि विद्यमान या खात्याचा पदभार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पूरव्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची घोषणा …
Read More »सतेज पाटील यांचा इशारा, अलमट्टीतील पाणी सोडायला लावा अन्यथा, कोल्हापूर-सांगली… पूर उपाययोजनाबाबत दोन्ही राज्यांमध्ये तातडीने मंत्री स्तरीय बैठक घ्यावी
धरण क्षेत्रात असलेल्या पावसाच्या जोरामुळे कोल्हापूर, सांगली परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकची मंत्री स्तरीय बैठक तातडीने आयोजित करावी आणि अलमट्टी धरणाचा विसर्ग १ लाख क्युसेक्स पर्यंत वाढवण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज …
Read More »सुधा मुर्ती आणि संभाजी भिडेंच्या या फोटोमागील सत्य : आवर्जून वाचा
कालपासून एका कार्यक्रमानिमित्त सांगलीमध्ये आलेल्या ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची भेट घेत त्यांच्या पाया पडल्याचे काही फोटो व्हायरल झाले. त्यामुळे बुध्दीमान आणि संवेदनशील असलेल्या सुधा मुर्ती या संभाजी भिडे यांच्या पाया कशा पडू शकतात असा सवाल अनेक नागरिकांना पडला …
Read More »पॉझिटिव्हीटी दर वाढला मग लसीकरणही वाढवा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या चारही जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आढळून येत आहे. …
Read More »पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार दोन महिन्याचे वेतन देणार सरकारी कर्मचाऱ्यांनीही एक-दोन दिवसाचे वेतन द्यावे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन
सांगली: प्रतिनिधी अतिवृष्टीचा फटका नऊ जिल्ह्यांना बसला असल्याने या भागातील नुकसान भरपाईसाठी मोठ्या प्रमाणावर महामदतीची गरज आहे. त्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करावी लागणार आहे. यापार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार हे आपले दोन महिन्याचा पगार देणार असल्याची घोषणा करत राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनीही आपले एक-दोन दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी द्यावे असे …
Read More »
Marathi e-Batmya