Tag Archives: shivsena (UBT)

अंबादास दानवे यांची घोषणा, “जनाधिकार” जनता दरबाराच्या माध्यमातून देणार उत्तर

महायुती सरकार राज्यभर राबवत असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपूर्ण जाहिरातबाजी व इव्हेंट मॅनेजमेंट चा उपक्रम असून प्रत्यक्षात राज्यातील नागरिकांना यातून कसलाही लाभ मिळाला नाही. राज्य शासन या कार्यक्रमात नुसत्या विविध लोकप्रिय घोषणा करते. त्यामुळे या अपयशी कार्यक्रमाची सत्यता सर्व महाराष्ट्रासमोर येण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रत्युत्तरात राज्यव्यापी “जनता …

Read More »

वंचित बहुजन आघाडी म्हणते, आमची शिवसेनेशी युती, मविआने जागावाटप…

जवळपास सहा महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे यावरून शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वंचितने काँग्रेसला पत्र पाठवून सहभागी करून घेण्याबाबत पत्रही लिहिले. त्यास काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचा …

Read More »

उद्धव ठाकरे यांची सूचना ,… याचा राजकिय इव्हेंट होऊ नये इतकेच

लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिलेले असतानाच भाजपाच्या रणनीतीनुसार आणि जाहिरनाम्यातील आश्वासनानुसार राम मंदिर उभारणीच्या कामाला युध्द पातळीवर सुरु आहे. त्यातच तसेच मुख्य राम मंदिराचे उद्धाटन २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाचा राजकिय …

Read More »

संजय राऊत यांचा पलटवार, पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक पर्याय, तुमच्याकडे तर…

तुमच्याकडे गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान पदासाठी एकच चेहरा आहे. पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कुणीही पंतप्रधान होऊ शकतं. देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल तेव्हा या नेत्यांपैकी कोणीही पंतप्रधान होऊ शकतो असा दावा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राच्या घोषणा हवेतच विरल्या

गेल्या ४८ तासांत दुष्काळ, सततची नापिकी याने त्रस्त ६ शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहेत. मात्र वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा या घोषणाच राहिल्या असून त्या हवेत विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. कोरोनाच्या नव्या …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल,… खरंच गुड गव्हर्नन्स तरी आहे का?

देशाचे माजी पंतप्रधान तथा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिवस. परंतु या दिवसाचे औचित्य साधत केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस हा गुड गव्हर्नन्स दिवस म्हणून जाहीर करण्यात आला. मात्र याच दिवसाचे औचित्य साधत शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल, रामलल्ला काय त्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे का

काही महिन्यांपूर्वी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारसभेत बोलत असताना भाजपाची सत्ता आल्यानंतर अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन मोफत घडविणार असल्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावरून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खोचक सवालही केला. मीरा भाईंदर …

Read More »

आदित्य ठाकरे यांची खोचक टीका, ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधील फरकच कळत नाही

राज्यातील सरकार हे दिल्लीच्या आशिर्वादाने बसलेले सरकार आहे. या सरकारकडून दिल्लीच्या आदेशानेच मुंबईची लूट करण्यात येत आहे. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी राज्याच्या लोकायुक्तांना पत्र लिहीत मुंबईतील फर्निचर घोटाळ्याप्रकरणाकडे लक्ष वेधले. त्यानुसार लोकायुक्तांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती युवासेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधील …

Read More »

अंबादास दानवे यांचा टीका, राज्यातील आरोग्यव्यवस्था मरणपंथाला

नांदेड, कोल्हापूर, संभाजीनगर, ठाणे व कळवा येथील शासकीय रुग्णालयात औषधं व डॉक्टरांअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला,या घटना राज्याला लाज वाटेल अशा आहेत. असे म्हणत राज्यातील आरोग्य व्यवस्था मरणपंथाला आली असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अंबादास दानवे म्हणाले, खासगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची घोषणा …

Read More »

अंबादास दानवे यांचा सवाल,… हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष का करावा लागतो विधान परिषद सभागृहात सवाल

मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने ऊर्ध्व भागातून मराठवाडयाला हक्काचे समन्यायी पाणी वाटप करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही या विभागाला नेहमीच यासाठी संघर्ष का करावा लागतो, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात उपस्थित केला. अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले, गोदावरी पाटबंधारे विकास …

Read More »