झोपडपट्टी प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यास प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास दहा वर्षे कालावधीपर्यंत मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तथापि ही मर्यादा पाच वर्षापर्यंत कमी करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, असे गृहनिर्माण मंत्री …
Read More »उदय सामंत म्हणाले, २०२७ पर्यंत बेस्ट उपक्रमात संपूर्ण बसगाड्या इलेक्ट्रिक
प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमातील संपूर्ण बसताफा हा सन २०२७ पर्यंत इलेक्ट्रिकवर करण्याचे प्रस्तावित करण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. बेस्ट बससेवेसंदर्भात सदस्य सुनिल शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना उदय सामंत बोलत होते. मंत्री उदय सामंत म्हणाले की, बेस्ट उपक्रमामार्फत सद्य:स्थितीत २१०० एकमजली व …
Read More »उद्धव ठाकरे म्हणाले…पेन्शन योजना लागू केल्यानंतर हार-तुरे स्विकारणार
काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठीच्या निवडणूकीत जूनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र त्याच आता वर्षाहून अधिक काळ लोटला तरी जूनी पेन्शन संदर्भात अद्याप कोणताही निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला नाही. या प्रश्नी सरकारी कर्मचाऱ्यांनी सध्या नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला. …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप,… राज्यातील आरोग्यव्यवस्था खिळखिळी
राज्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे त्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागतो आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील आरोग्यव्यवस्था खिळखिळी झाली असल्याची टीका करत खिळखिळी झालेली आरोग्यव्यवस्था राज्य सरकारने सुधारावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील ढासळलेली व व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात आज मविआच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर …
Read More »आदित्य ठाकरे यांचा उपरोधिक टोला, ….तो फोटो पाह्यला आणि मला हसूच आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वच्छता मोहिमेतील ट्रॅक्टर चालवतानाच्या फोटोवरून टीका
पाच राज्यातील निवडणूकांमध्ये काँग्रेसच्या ताब्यातील तीन राज्ये भाजपाने हिसकावून घेतली आणि काँग्रेसला बऱ्याच वर्षानंतर फक्त दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातील सत्ता पुन्हा मिळविता आली. विशेष म्हणजे भाजपाच्या विरोधात निर्माण झालेल्या इंडिया आघाडीच्या बाजूने वातावरण असतानाही भाजपाला मोठ्या प्रमाणात विजय मिळाला. त्यातच राज्यात काँग्रेस, भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष …
Read More »गारपीट, अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा
राज्यात मागील आठ दिवसांपासून निसर्गाचा कोप झाला आहे. यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गारपीट व अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज २८९ अनव्ये सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्याद्वारे केली. अंबादास दानवे म्हणाले की, राज्यातील …
Read More »मलिकांना देशद्रोही ठरविण्याचा डाव देवेंद्र फडणवीसांच्याच अंगाशी, अजित पवारांना पत्र…
राज्यात शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपाच्या धुरिणांना मोठा आनंद झाला होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आपला संबध “त्या” एका गायिकेने काढलेल्या ड्रग्ज माफियांशी काढलेल्या फोटोचा संबध जोडून राजकिय जीवन कलंकित करण्याचा प्रयत्न करू पहात असल्याच्या आणि ड्रग्ज माफिया …
Read More »अंबादास दानवे यांचा इशारा,… याप्रश्नावरून हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणार
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर व शेतकरी आत्महत्या, सरकारी खात्यात वाढलेला भ्रष्टाचार, ड्रग्स माफिया, बेरोजगारी आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अंबादास दानवे म्हणाले की, …
Read More »उद्धव ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांच्या संकटावरून सत्ताधाऱ्यांवर आसूड, अवकाळीचं दुःख…
एकाबाजूला पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये पावसाने बऱ्यापैकी हजरी लावली अशा भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण आता हाता तोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीपासूनच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. त्यातच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारने …
Read More »अंबादास दानवे यांची मागणी, ..सर्व विद्यार्थ्यांना महाज्योती तर्फे फेलोशिप द्या
महाज्योती संस्थेतर्फे संशोधन करण्यासाठी ओबीसी, भटके विमुक्त विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप मागील वर्षांच्या निकषात बसणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारकडे केली. गेल्या ३२ दिवसांपासून राज्यातील विविध भागातील ओबीसी व भटके विमुक्त प्रवर्गातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील संशोधक विद्यार्थी हे सर्व पात्र …
Read More »
Marathi e-Batmya