Tag Archives: spokesperson

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांचा खुलासा, भारतातील १.४ अब्ज लोकांच्या इंधन ऊर्जेचा प्रश्न महत्वाचा अमेरिकेने केलेल्या दाव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

भारताने गुरुवारी (५ फेब्रुवारी, २०२६) ठामपणे सांगितले की, आपल्या १.४ अब्ज लोकांसाठी ऊर्जा अर्थात इंधन सुरक्षा सुनिश्चित करणे हा पेट्रोलियम उत्पादने मिळवण्याबाबतच्या आपल्या दृष्टिकोनाचा गाभा आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका पत्रकार परिषदेत केलेली ही टिप्पणी, भारताने रशियन तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवल्याच्या वॉशिंग्टनच्या दाव्याला उत्तर म्हणून आली …

Read More »

रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांची स्पष्टोक्ती, रशियन तेलाबाबत भारताचा निरोप नाही तेल खरेदीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या माहिती नंतर रशियाचा खुलासा

रशियाला रशियन तेलाची खरेदी थांबवण्याबाबत भारताकडून कोणतेही निवेदन मिळालेले नाही, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी २०२६) सांगितले. रशियन माध्यमांच्या वृत्तानुसार, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी असेही सांगितले की, रशिया भारतासोबतचे संबंध सर्वतोपरीने विकसित करणे सुरू ठेवण्याचा मानस आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले पूर परिस्थितीत नागरिकांना मदतीच्या नावाखाली गेल्या अन् जिल्हाधिकाऱ्यांकडूनच शहाणपण शिकल्या

सोलापूर येथील सीना नदीला पूर आल्याने माढा, मोहोळ, उत्तर  सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना पुराचा चांगलाच फटका बसला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून ज्योती वाघमारे यांनी थेट …

Read More »

पीटर नवारो यांची टीका परराष्ट्र खात्याने फेटाळून लावली परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिले प्रत्युत्तर

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांच्या अलीकडील विधानांना जोरदारपणे नकार दिला आणि त्यांना “चुकीचे” आणि “दिशाभूल करणारे” म्हटले. MEA चे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “आम्ही पीटर नवारो यांनी केलेली चुकीची आणि दिशाभूल करणारी विधाने पाहिली आहेत आणि अर्थातच, आम्ही ती …

Read More »

भाजपाच्या प्रवक्त्या आरती साठे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशःकाँग्रेस-राष्ट्रवादीची टीका हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, आता न्यायपालिकेतही भाजपाचा थेट प्रवेश

लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही डळमळीत होत चालला आहे. आता तर थेट न्यायाधिशपदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते आणि हा …

Read More »

काँग्रेसची टीका, फडणवीसांची सपकाळांविषयी ‘नया है वह’ प्रतिक्रीया हिंदी सक्ती मानसिकतेतून’ ‘काँग्रेस अध्यक्षांना’, गुन्हेगारी आरोपांबाबत अँफीडेव्हीट देण्याची गरज कधी भासली नाही..!!

मुख्यमंत्री फडवीसांवर हिंदी’चा प्रभाव किती खोलवर पोहेचलाय हे काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळांचे आरोपां प्रती, पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर, फडणवीसांनी अनाहुत पणे दिलेली.. ‘नया है वह’ ची प्रतिक्रिया” हिंदी सक्तीच्या मानसिकतेतुन दिसुन आली व मोदी-शहांच्या दमनशाही वृत्तीचा मुख्यमंत्र्यांना ‘वाण नाही पण गुण लागला’हे स्पष्ट झाल्याचे टिकात्मक प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी  …

Read More »

संजय निरूपम यांची काँग्रेसवर टीका, ओबीसी मतांसाठी केलेला ठराव निंदनीय काँग्रेस अधिवेशनात केलेल्या ठरावावरून निरूपम यांची टीका

ओबीसी मतांसाठी काँग्रेसने केलेला ठराव निंदनीय असल्याची टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांची आज केली. अहमदाबादमधील अधिवेशनात काँग्रेसने त्यांच्या मूळ भूमिकेशी पूर्णपणे युटर्न घेतला. जाती धर्माच्या आडून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात ठराव न करता, काँग्रेस नेतृत्वाने ओबीसींच्या मतांसाठी ठराव केला, यातून समाजाला जातीपातींमध्ये विभागण्याची काँग्रेसची भूमिका आहे, त्याचा तीव्र …

Read More »

अतुल लोंढे यांचा पलटवार,… आधी भाजपाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे ट्विट नीट पहावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी

शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे नेते जो आकांडतांडव करत आहेत त्याआधी त्यांनी त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट नीट पहावे आणि नंतर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपानेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांचा आरोप, हा अपघात नव्हे तर हत्याकांड दर तासाला १५०० जनरल डब्ब्याची तिकिटे विकली जात होती

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जे घडले ते अपघात नव्हते तर हत्याकांड होते, सुरक्षेचा मोठा अभाव आहे. रेल्वे प्रशासनाला मोठ्या संख्येने भाविकांच्या आगमनाची अपेक्षा होती. १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्टेशनवर दर तासाला १५०० जनरल तिकिटे विकली जात होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मृत्युची आकडेवारी लपवण्यात व्यस्त आहेत. याप्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल,… निधी देण्यासाठी पैसा काय सरकारच्या बापाचा आहे का?

भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही, विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. निधी वाटपात भेदभाव करण्याचे प्रकारही उघड झालेले आहेत. मुंबईतील केवळ सत्ताधारी पक्षांच्याच आमदारांना ५०० कोटी रुपयांची खैरात करणे व विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराला एक फुटकी कवडीही न देणे …

Read More »