कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये अनुदान द्या शिवसेनेची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ५०० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे.

मध्य प्रदेश सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल  ८०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर राज्यातही भावांतर योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या द्राक्षे डाळिंब लसूण या शेतीमाल खरेदी आणि निर्यात करणार्यां व्यापारी वर्गाला २५ ते ३० टक्के वाहतूक अनुदान दिले जाते. कांद्यांची खरेदी आणि निर्यात करणाऱ्यांना ही वाहतूक सवलत दिली जावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

About Editor

Check Also

“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून, समान वेतन, कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करा एआय अॅग्री २०२६ परिषदेत तज्ञांची शिफारस

शाश्वत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी ठरत असतानाच, या तंत्रज्ञानात लिंग-संवेदनशीलता जपणे अत्यावश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *