कृषी

आंब्याचे उत्पादन वाढविणे, किडीमुळे नुकसान थांबविण्यासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स कोकणातील आंबा उत्पादकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्याची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, याशिवाय आंब्याचे घटणारे उत्पादन, किडीमुळे होणारे नुकसान याबाबतीत कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

प्रथमच शेतकऱ्यांना केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसानभरपाई मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती

जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सी.एम.व्ही. (कुकुंबर मोझंक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसानापोटी १९ कोटी ७३ लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. (कुकुंबर …

Read More »

पीएम किसानचा लाभ वडील आणि मुलाला एकत्र मिळणार? हा आहे नियम केंद्र सरकारचा नवा नियम

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात.ही रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दिली जाते. शेतकऱ्यांना एका हप्त्यात २,००० रुपये मिळतात.नुकताच या योजनेचा १४ वा हप्ता देण्यात आला आहे. आता शेतकरी १५ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेचा लाभ …

Read More »

राजू शेट्टी यांची स्पष्टोक्ती, इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय…. महाविकास आघाडीने एकदा विचारायला हवं होतं

इंडिया आघाडीची बैठक उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख २८ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यात काँग्रेससह राजदचे लालूप्रसाद यादव, जनता दल युनायटेडचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टलिन, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. …

Read More »

कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी ५२४ कोटींचा आराखडा सादर करा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून या योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या ५२४ कोटींच्या निधीच्या खर्चाचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. राज्याच्या अर्थसंकल्पात सोयाबीन व कापूस पिकांसाठी सन २०२२-२३ ते …

Read More »

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता गतीने वितरित करा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महा आयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, कृषी संचालक दिलीप झेंडे, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे केंद्र सरकारला पत्र, कांदाप्रश्नी केली ही मागणी मुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती

राज्यात कांदा प्रश्नावरून तापलेले वातावरण शांत करण्यासाठी दिल्लीतील मोदी सरकारच्या आदेशान्वये महाराष्ट्रातल शेतकऱ्यांचा किमान २ मेट्रिक टन कांदा नाफेड मार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत जाहिर केला. मात्र तरीही शेतकऱी संघटनेच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले नाही. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …

Read More »

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, या तीन खतांना पर्यायी चालना द्या.. राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील खते उपलब्धतेचा आढावा

केंद्रीय रसायने आणि खते, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज देशात खतांची उपलब्धता आणि वापराबाबत राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी संवाद साधला. बैठकीदरम्यान त्यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि क्षेत्रीयस्तरावर पर्यायी खतांना चालना देण्याच्या प्रगतीचा आणि त्यासंदर्भात राज्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. डॉ मनसुख मांडविया यांनी सर्व …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे

राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्याचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी …

Read More »

मृद व जलसंधारण विभागांतर्गत ६७० पदांची भरती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. मंत्री संजय राठोड म्हणाले की, शासन अधिसूचना २१ सप्टेंबर २०२१ नुसार जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या पदांचे …

Read More »