Editor

नाना पटोले यांचा आरोप, ईव्हीएम सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून, जनतेशी देणेघेणे नाही ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणावर दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडी आक्रमक

ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलित बांधवांवर अत्याचार केले. सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर …

Read More »

भास्कर जाधव यांच्या आक्षेपामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधेयकच मागे घेतले विधेयक आता चर्चेसाठी ठेवणार आता मागे घेतो

राज्यातील महायुती सरकारला संशयातीत बहुमत मिळाल्यानंतर नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणे सुरु होते. तसेच दुपारनंतर काही काळ राज्यातील राज्य सरकारकडून विधेयक मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या विधेयके विधानसभेत मांडून त्यास मंजूरी देण्याची प्रक्रिया ही अध्यक्षांकडून पार पाडली जात होती. मात्र शिवसेना उबाठाचे …

Read More »

छगन भुजबळ यांचा अजित पवार- पटेल यांना इशारा, उठ म्हंटलं की उठायचं आणि बस… हा भुजबळ तसा माणूस नाही

राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी असा वाद रंगलेला असताना त्यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच शेवटपर्यंत लोकसभा निवडणूकीतून उमेदवारी जाहिर करण्यावरून महायुतीने एकंदरीत घोळ घालण्यात आल्याचे दिसून आले. परंतु या प्रकरणावर आतापर्यंत मतप्रदर्शन करण्याचे टाळत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र मंत्री पदाच्या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, गुंडांना संरक्षण देण्यासाठी जनतेने बहुमत दिले का? आजच्या कामकाजावर काँग्रेसचा बहिष्कार

राज्यात महायुती सरकारचे बहुमतात सरकार आले. या सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळाले का असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधकांनी पायऱ्यांवर परभणी आणि बीड प्रकरणी आंदोलन केले. त्यानंतर कामकाज …

Read More »

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची उच्च न्यायालयात धाव खंडणीचा गुन्हा रद्द करा

खंडणी, फौजदारी कट रचणे आणि बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. व्यावसायिक संजय पुनामिया यांनी राजकीय सूडबुद्धीने आपल्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवल्याचा दावाही पांडेनी याचिकेतून केला आहे. संजय पांडे यांनी पोलीस महासंचालकपदाचा दुरूपयोग केला तसेच …

Read More »

उच्च न्यायालयाने अदानीच्या विरोधातील याचिकाकर्त्याला ठोठावला ५० हजाराचा दंड अदानीला वीज पुरवठ्यासाठीचे कंत्राट देण्याचा निर्णय योग्य

राज्यात औष्णिक वीज पुरवठ्याचे कंत्राट अदानी ट्रान्समिशनला देण्याचा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. तसेच, याचिकाकर्त्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. अदानी ट्रान्समिशला दिलेल्या ६६०० मेगावॅटच्या कंत्राटाबाबत केलेले आरोप हे तथ्यहीन असल्याचे निरीक्षण मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रिट …

Read More »

पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रती अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट भारत-श्रीलंका दरम्यान नव्या वाटाघाटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यात नवी दिल्लीत विस्तृत चर्चा झाली, ज्याने दोन शेजारी देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. सप्टेंबर २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दिसानायके यांचा हा पहिला अधिकृत विदेश दौरा होता, ज्याने भारत-श्रीलंका संबंधांना दिलेले महत्त्व अधोरेखित केले. १५ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या …

Read More »

एसआयपी म्युच्युअल फंड मध्ये भरा २० रूपये २० वर्षे आणि परतावा भरगच्च मिळवा भविष्यात मिळणार ३४ लाख रूपये किंवा त्याहून अधिक

किरकोळ गुंतवणूकदारांच्या विक्रमी सहभागासह, म्युच्युअल फंडांमधील पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIPs) लोकप्रिय होत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, एसआयपी SIP खात्यांची संख्या नोव्हेंबर २०२४ मध्ये १०.२२ कोटीच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली, जी ऑक्टोबरमध्ये १०.१२ कोटी होती. एसआयपी एयूएम (ॲसेट अंडर मॅनेजमेंट) देखील १३.५४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, जे इक्विटी मार्केटमधील लहान गुंतवणूकदारांच्या वाढत्या स्वारस्याचे …

Read More »

रेल्वेचे तिकीट दर महागणार? रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाकडे लक्ष स्थायी समितीच्या अहवालानंतर पर्यायांचा विचार

रेल्वे प्रवास परवडणारा ठेवण्यासाठी भारतीय रेल्वे ५६,९९३ कोटी रुपये प्रति तिकीट ४७% सबसिडी देते. आता, रेल्वेवरील संसदीय स्थायी समितीने शिफारस केली आहे की सरकार चालवल्या जाणाऱ्या वाहतूकदारांनी किमतीपेक्षा कमी भाड्याच्या किंमतीसह सामाजिक सेवा दायित्वाच्या कारणास्तव तोट्याचा आढावा घ्यावा. प्रवासी भाडे हा एक संवेदनशील मुद्दा राहिला आहे, कारण रेल्वे हे जनतेसाठी …

Read More »

भारताची निर्यात घटली, व्यापारी तूट ३२.८४ अब्ज अमेरिकन डॉलरवर ऑक्टोंबर मधील दुहेरी अंकी वाढीनंतर घसरण

नोव्हेंबरमध्ये भारताची निर्यात वार्षिक ४.८५ टक्क्यांनी कमी होऊन (YoY) $३२.११ अब्ज झाली, तर सोन्याच्या आयातीतील विक्रमी वाढीमुळे व्यापार तूट $३७.८४ अब्जच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. ऑक्टोबरमध्ये दुहेरी अंकी वाढ नोंदवल्यानंतर ही घसरण झाली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भाजीपाला तेल, खते आणि चांदीच्या मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये आयात २७ टक्क्यांनी वाढून विक्रमी …

Read More »