Editor

उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल, वेळेआधी उमेदवारांचे अर्ज नाकारले कसे ? मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेनंतर अर्ज भरणाऱ्या राज्यातील विविध पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणास्तव फेटाळले ?, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (ईसीआय) केली. तसेच त्याबाबत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ३० ऑक्टोबर शेवटचा दिवस होता. …

Read More »

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात १०५ अंतिम उमेदवार तर उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात ३१५ अंतिम उमेदवार

मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी आज उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम १०५ उमेदवार आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज दिली. उमेदवारी अर्ज …

Read More »

रश्मी शुक्ला यांच्या बदलीबाबत शरद पवार यांचे मोठे विधान, निवडणूक आयोगाचा निर्णय अगदी… आता दिर्घकाळ त्या पदावर राहणार नाही याकडेही लक्ष द्यावं

काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मानलेल्या भगिनी रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे सातत्याने केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी केली होती. …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचे भाकित, मविआच्य़ा विजयाने केंद्रात बदल घडेल सामाजिक न्याय खात्याला मंत्रीच नाही, आरक्षण संपविण्याचा डाव

मागास प्रवर्गाच्या सामाजिक उत्थानाच्या योजना बंद होत आहेत. ओबीसी एसटीएससी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप बंद करणे. हा या सरकारचा एजेंडा असल्याचे सांगत राज्यातील महाविकास आघाडीचा विजय हा केंद्रातील सत्ता बदल ठरेल दोन महिन्यात त्याचे परिणाम दिसतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. राज्यातील महाविकास आघाडी …

Read More »

पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक राज्यात ९.७ कोटी मतदार

विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे. पुण्यात ८८ लाखांहून अधिक मतदार पुण्यातील एकूण मतदारसंख्या ८८ लाख ४९ …

Read More »

प्रकाश जावडेकर यांचे आवाहन, काँग्रेसच्या खटाखट गॅरंटीला भुलू नका काँग्रेस खोटी आश्वासने देणारा पक्ष

निवडणूक आली की खटाखट खोटी आश्वासने देण्याची काँग्रेसला सवयच आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली कोणतीच आश्वासने त्यांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये पाळली नसल्याने महाविनाश आघाडीवर कोणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यातील मतदारांना केले आहे. भाजपा मीडिया सेंटर येथे …

Read More »

नाना पटोले यांची प्रतिक्रिया, धन्यवाद, पण रश्मी शुक्लांना हटविण्यात वेळ का लागला? निवडणुकीसंदर्भातील कोणतेही काम रश्मी शुक्ला यांना देऊ नका

वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना …

Read More »

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत या उमेदवारांचे बंड झाले थंड पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड केलेल्या बहुतांष उमेदवारांनी घेतली निवडणूकीतून माघार

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी राज्यातील जवळपास सर्वच पक्षाकडून उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड करत अपक्ष आमदार म्हणून उमेदवारी अर्ज भरला. परंतु या बंडखोर उमेदवारांमुळे विधानसभा निवडणूकीत दरम्यान डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचा परिणाम पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या मताधिक्यावर होणार असल्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या …

Read More »

काँग्रेस-मविआला धक्का कोल्हापूर उ. मधून मधुरिमा राजे घाटगे यांचा अचानक अर्ज मागे खासदार शाहु महाराज यांची माहिती

विधानसभा निवडणूकीच्या रिंगणातून अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. मात्र कोल्हापूर उत्तर मधून खासदार शाहु महाराज घाटगे यांच्या स्नुषा तथा मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमा घाटगे यांनी आज अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठांना नेत्यांना याची कल्पना दिली …

Read More »

निवडणूकीपूर्वी काँग्रेस-महाविकास आघाडीच्या खात्यात पहिला विजय रश्मी शुक्ला केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक मुख्याधिकाऱ्यांना आदेश

राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवृत्तीनंतरही दोन वर्षाची सेवावाढ देण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने अर्थात भाजपाचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर रश्मी शुक्ला यांची पोलिस महाचसंचालक पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी सातत्याने काँग्रेसने दोन वेळा राज्याचे निवडणूक मुख्याधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. …

Read More »