Editor

सौरव दत्ता यांच्या त्या २५ लाख उत्पन्नावर नेटकऱ्याकडून प्रतिक्रियांचा पाऊस महिन्याकाठी १.५० लाख रूपयांची कमाई

वादग्रस्त वक्तव्यावरून ओळखले जाणारे, गुंतवणूकदार सौरव दत्ता यांनी त्यांच्या एक्स X वर नवीन पोस्ट करत एक वेगळेच मत व्यक्त केल्याने, त्यांच्या ट्विटवरून नेटकऱ्यांमध्ये वाद विवादाला सुरुवात झाली आहे. सौरव दत्ता यांनी एका पोस्टमध्ये, दावा केला आहे की वार्षिक ₹ २५ लाख पगार तीन लोकांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी पुरेसा नाही असे …

Read More »

डिएसपी म्युच्युअल फंडने जारी केला पहिला निफ्टी एनएफओ इंडेक्स भारतात पहिला निफ्टी १० इक्वल वेट

डिएसपी DSP म्युच्युअल फंडाने भारतातील पहिला निफ्टी टॉप १० इक्वल वेट इंडेक्स फंड आणि ईटीएफ लॉन्च केला आहे, जो फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनद्वारे निफ्टीमधील टॉप १० भारतीय कंपन्यांमध्ये समान गुंतवणूक करेल. डीएसपी निफ्टी टॉप १० इक्वल वेट इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी टॉप १० इक्वल वेट ईटीएफचे उद्दिष्ट निफ्टी 50 …

Read More »

रिझर्व्ह बँकेकडून टाटा कॅपिटलला इन्व्हेस्टमेंट क्रेडिट कंपनी ची मान्यता १ एप्रिल रोजीच्या पत्राच्या आधारे दिली मान्यता

रिझर्व्ह बँकेने टाटा कॅपिटलचे NBFC – कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी (CIC) मधून NBFC – इन्व्हेस्टमेंट क्रेडिट कंपनी (ICC) मध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली आहे. टाटा कॅपिटल, टाटा सन्सची एक महत्त्वाची उपकंपनी, टाटा क्लीनटेक कॅपिटल आणि टाटा कॅपिटल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा समावेश असलेले विलीनीकरण अलीकडेच पूर्ण केले, टाटा कॅपिटलच्या शेअर्समध्ये दाखल केल्यानुसार. “यामध्ये …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्यदिनी ‘संविधान वाचन’ उपक्रम राबवणार जनसन्मान यात्रेला पाच दिवसात अभूतपूर्व प्रतिसाद ;महिलांची उपस्थिती लक्षणीय...

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्य दिनी ‘संविधान वाचन’ असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या मुख्य कार्यालयात व प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत प्रश्न निर्माण करण्यात आला होता. देशाचे संविधान हा …

Read More »

मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहिण योजनेवरून आमदारांच्या वक्तव्यांचे पडसाद भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या वक्तव्यावरून दिली समज

साधारणतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला दोन वर्षे दोन महिने पूर्ण झाले. या दोन वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टींबाबत निर्णय घेतला. मात्र केंद्रातील सरकारच्या धर्तीवर आश्वासक अनेक गोष्टींच्या घोषणा करायच्या परंतु निर्णय एकही घ्यायचा नाही …

Read More »

अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,… सरकारवर बोलल्यावर माझ्या नव-याला ईडीची नोटीस येते

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत घरच्याच मैदानावर अर्थात बारामतीत नणंद विरूध्द भावजय अर्थात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी दिली. त्याबाबत एका वृत्तवाहिनीला अजित पवार यांनी मुलाखत देताना ती मोठी चूक होती अशी कबुली दिली. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांना …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, कर्ज घेऊन टेंडर काढले व ३० टक्के कमीशन खाल्ले महायुती सरकारला बहीण नाही तर सत्ता लाडकी- बाळासाहेब थोरात

देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत पण महाभ्रष्ट महायुती सरकार शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, शेतमालाला एमएसपी नाही. डॉ. मनमोहनसिंह सरकारने शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही. महागाई व बेरोजगारी नियंत्रणाचा कार्यक्रम या सरकारकडे नाही. …

Read More »

मानखुर्द येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पहिले अहिल्याभवन उभारणार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले ‘अहिल्याभवन’ मानखुर्द येथे उभारले जाणार असल्याची घोषणा आज केली. जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या अहिल्याभवनासाठी ४७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच ३५,५०० स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले …

Read More »

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. सन २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव …

Read More »

नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका कधी ?

राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येतील. राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२१-२२ मध्ये झाल्या असून त्याचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. …

Read More »