Editor

सी रंगराजन यांचा इशारा, रोजगाराशिवाय वाढ चिंतेचा विषय आत्मनिर्भर आयात धोरणाचा भाग

रशियन-युक्रेनियन युद्धामुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे, अनेक देशांनी ‘गंभीर आयात’ संदर्भात आत्मनिर्भर होण्याचा विचार सुरू केला आणि भारताने “आत्मनिर्भर” अकार्यक्षम ‘आयात प्रतिस्थापित म्हणून होऊ नये याची खात्री करणे आवश्यक असल्याचे मत आरबीआय बँकेचे माजी गर्व्हनर सी रंगराजन यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना सी रंगराजन यांनी इशारा दिला की, आत्मनिर्भर हे आयात …

Read More »

पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा विमा कंपन्यांशी बोलून नुकसानग्रस्तांना लगेच मदत द्या- मुख्यमंत्री शिंदे

पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकतानगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करा असे निर्देश देतांना निळ्या पूर रेषेतील (ब्ल्यू लाईन) नागरिकांचे कायमस्वरूपी पूनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका, जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा, असे निर्देश …

Read More »

भारतीय हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ कोयना, खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरण क्षेत्रातील अतिवृष्टी

पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची …

Read More »

जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण, ‘ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही’ 'कोणी जर सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल'

सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत, त्यांचा माझा कधी संबंध आला नाही. त्या बाईटमध्ये पत्रकार खोदून विचारतो मग ते उत्तर देतात. आजकाल तुरुंगात असणाऱ्या माणसांच्या मुलाखती होत आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत. त्यांना उत्तर मला आवश्यकता वाटत नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, कैदेतील सचिन वाझेला मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी? भाजपाकडून सरकारी यंत्रणांचा पुन्हा गैरवापर, सचिन वाझेचा बोलविता धनी कोण?

निलंबित पोलीस अधिकारी व सध्या गंभीर गुन्ह्याखाली कैदेत असलेल्या सचिन वाझेनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यामागे कोणती शक्ती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कोठडीत असलेल्या आरोपीला मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही मग सचिन वाझेलाच मीडियाला बोलण्याची परवानगी कोणी दिली, याची चौकशी झाली पाहिजे तसेच सचिन वाझेच्या बंदोबस्तासाठी जे …

Read More »

सचिन वाझे यांचे नवे आरोप, अनिल देशमुख म्हणाले ही तर फडणवीसांची चाल पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे यांच्यापर्यंत सदर वृत्तसंस्थेचा प्रतिनिधी पोहोचलाच कसा

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे सरकारच्या काळातील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांची वसुली करण्यास सांगितल्याच्या प्रश्नावरून सातत्याने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे श्याम मानव यांनीही या वादात उडी घेत भाजपाचे वरिष्ठ …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, अब्दाली शाहचा वंशच, वळ बघायला आला होता का? धनुष्यबाण हटवा, मला मशाल हवीय शाखे शाखेंच्या फलकावर

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या मशालीने भाजपाचा पराभव केला. तरीही मध्यंतरी बालेवाडीत एकमेकांच्या पाठीवर पडलेले वळ बघायला अब्दाली शाहचे वंशच इथे आले होते का असा सवाल करत तो अब्दाली शाह तो होता. आताचा अमित आहे हे विसरू नका असे सांगत जशी औरंगजेबाची कबर इथे महाराष्ट्रात बांधली तशी भाजपाची कबरही महाराष्ट्रात …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, उड्डाणपुल भूमिपुजनाचा कार्यक्रम भाजपाचा का सरकारचा? जाहिरात देण्याचा भाजपाला काय अधिकार ?

भारतीय जनता पक्ष लोकशाही, संविधान मानत नाही हे वारंवार उघड झाले आहे, त्याविरोधी काँग्रेस एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून नेहमीच आवाज उठवत आला आहे. भाजपाच्या या तानाशाहीवृत्तीचा आज नागपुरातही प्रत्यय आला. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाच्या नेते व मंत्र्यांच्या उपस्थितीत भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला परंतु या कार्यक्रमाचे काँग्रेसच्या …

Read More »

जानेवारी ते मे २०२४ मधील अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई वाटपास मंजूरी ५९६ कोटी रुपये वाटप होणार- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना ५९६ कोटी २१ लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे …

Read More »

निवडणूकांच्या तोंडावर भाजपाच्या मंत्र्यांकडून “संविधान मंदिर” कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विविध वर्गातील मतदारांना खुष करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध घोषणा करण्यात येत आहे. त्यातच आता भाजपाच्या एका मंत्र्यांनी तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेषतः दलित मतदारांना खुष करण्यासाठी आयटीआयच्या प्रत्येक कॉलेजमध्ये संविधान मंदिर उभारण्याची योजना जाहिर केली आहे. महाराष्ट्रातील सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १६३ शासकीय …

Read More »