Breaking News

वीज बील न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार वीज मंत्र्यांच्या उत्तराच्या निषेधार्थ विरोधकांचा सभात्याग

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर वीजच्या रकमेची थकबाकी आहे. मात्र काही वीज बीलांच्या रकमेत तांत्रिक कारणामुळे अवाच्या सव्वा वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३ ते ५ हजार रूपये भरावे असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले असून जे शेतकरी सांगितलेली रक्कमही भरणार नाहीत. त्यांना वीज पुरवठा करणारे रोहीत यंत्र आणि वीज …

Read More »

माझ्या विरोधाचा अर्कच वेगळा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपला कोणताही मदतीचा हात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिला जात नसून विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर सातत्याने राज्य सरकारच्या धोरणावर टीका करण्यात येत आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार, जयंत पाटील आदींकडूनही टीका करण्यात येते. मात्र माझ्या विरोधाचा अर्कच वेगळा असून तो आतूनच येत असल्याचे प्रतिपादन विधान …

Read More »

कामगाराला अपघात घडल्यास ठेकेदारासोबत व्यावसायिकालाही सहआरोपी करणार कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्यात २७ लाख बांधकाम मजूर व कामगारांसाठी नवीन धोरण आखण्याचे काम सुरु असून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यापार्श्वभूमीवर एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी अपघात होवून बांधकाम करणारा कामगारास दुखापत अथवा दुर्दैवी घटना घडल्यास बांधकाम व्यावसायिकालाही ठेकेदारासोबतच सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री …

Read More »

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री खोटे बोलतायत कर्जमाफीची यादी सभागृहात सादर करण्याचे जयंत पाटील यांचे आव्हान

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील कर्जमाफीचा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच मिळाला नसून कर्जमाफीचा अर्ज भरणाऱ्या रमेश कटपला बँकेत खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. मेसेज आल्यानंतर चौकशी केली तर पैसे आलेले नसल्याचे उत्तर बँकेकडून सांगण्यात आले. असेच नाव युवराज पाटील आणि त्यांच्या मुलाचं असून ही दोन्ही नाव मुख्यमंत्र्यांनी घेतले. या …

Read More »

दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या एसटी वाहतूकीवरील बंदी उठविली परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातून शहरी किंवा तालुक्याच्या ठिकाणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पोहचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून एस.टी बसेसचा वापर केला जात असे. मात्र त्यावर गेल्या महिन्यात एसटी महामंडळाने बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होवू लागल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांवर घालण्यात आलेली बंदी उठविण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकार …

Read More »

कमी पटसंख्येच्या शाळांचे स्थलांतर केवळ विद्यार्थ्यांच्या हिताठीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा विधान परिषदेत दावा

नागपूर: प्रतिनिधी राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांची सामाजिकीकरणाची प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा हक्क कायम राखण्यासाठी राज्यातील ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद नव्हे तर स्थलांतरित करण्याचा करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने घेतलेला हा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हितासाठीच घेण्यात आल्याचा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी …

Read More »

मुंबई महापालिकेच्या विभाजनावरून भाजप-काँग्रेस समोरासमोर तर शिवसेनेला उशीराने जाग ; सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई महापालिकेचे तीन भागात विभागण करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी केली. मात्र भाजपने याचा राजकिय फायदा उठविण्यासाठी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडण्यासाठी काँग्रेसकडून हा प्रस्ताव आणला जात असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला. त्यामुळे सत्ताधारी भाजप …

Read More »

राणेची जबाबदारी आमच्यावर तर खडसे प्रस्थापित नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट कबुली

नागपूर : प्रतिनिधी मागील अनेक दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावराबरोबरच एनडीएचे घटक पक्ष बनलेले नारायण राणे आणि भ्रष्टाचारासह विविध आरोपावरून मंत्रीपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे यांच्या समावेशाबाबत चर्चा सुरु आहे. त्यानुसार विस्थापित असलेल्या नारायण राणे यांची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. तर मंत्री पदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे हे भाजपमधील प्रस्थापित नेते …

Read More »

निकाल गुजरातचा मात्र असुरक्षिततेची भावना महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांमध्ये काँग्रेससह सर्वच विरोधकांमधील आत्मविश्वास दुणावला

मुंबई : प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वंच राज्यामध्ये भाजपच्या अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उधळलेल्या राजकिय वारूला कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र गुजरात विधानसभेत भाजप ९९ जागां जिंकत तेथील सत्तेवर चवथ्यांदा स्थानापन्न होणार असली तरी तेथील निसटत्या विजयाने भाजपमधील नेते-कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली असून गुजरातच्या निकालाची …

Read More »

पोलिओ डोस खरेदीतील घोटाळ्याची चौकशी करणार अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची माहिती

नागपुर : प्रतिनिधी हाफकीन या देशातील एकमेव कंपनीकडून पोलिओ डोस खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता मुख्य सचिवांच्या अध्यक्षेखाली समिती नियुक्त केली असून सदर समितीचा अहवाल सादर होताच कारवाई करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि औषधी द्रव्य मंत्री गिरीश बापट यांनी दिली. विधानसभेत …

Read More »