Breaking News

कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे? नवाब मलिकांचा मध्यरात्री आणखी एक वानखेडेंच्या विरोधात फोटो बॉम्ब

मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या खऱ्या जातीवरून सध्या वादंग निर्माण झालेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या लग्नातील आणखी फोटो ट्विट करत आणखी एक माहिती पुढे आणली आहे. विशेष म्हणजे या फोटोत समीर वानखेडे यांच्या अर्धवट चेहरा दिसत असला तरी त्यांनी इस्लाम पध्दतीची गोल …

Read More »

फडणवीसांच विधान बेजबाबदारपणाच अमरावतीतील वातावरण भाजपने बिघडवण्याचा प्रयत्न करु नये- ॲड यशोमती ठाकूर

मुंबई: प्रतिनिधी अमरावती येथील वातावरण बिघडण्याचा भाजपाने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही, १२ आणि १३ तारखेला अमरावतीत जे घडलं तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता, आता याचं राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये अशी प्रतिक्रीया अमरावतीच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी …

Read More »

फडणवीसांचे आव्हान, आम्ही मान्य करतो मग तुम्ही घालणार का बंदी? आहे का हिंमत रझा अकादमीवरून फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

अमरावती-मुंबई: प्रतिनिधी काँग्रेसच्या काळात रझा अकादमीने पोलिसांवर हल्ले का करते, रझा अकादमी ही कोणाची बी टीम आहे? हे सगळं माहित आहे. पण ते आमच्यावर आरोप करतायत की रझा अकादमी आमची बी टीम आहे म्हणून, चला आम्ही मान्य करतो मग तुम्ही घालणार का बंदी? आहे का? काँग्रेसमध्ये हिंमत असा उपरोधिक असा …

Read More »

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मदत १५ लाखांची मदत पतीला नोकरी-मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन

मुंबई: प्रतिनिधी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात कर्तव्यावर असताना वनसंरक्षक  वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जाहीर केले. ताडोबा-अंधारी प्रकल्पातील …

Read More »

आता विनोद तावडे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस महाराष्ट्रातून स्व.महाजन, गडकरी यांच्यानंतर राष्ट्रीय राजकारणात तावडे तिसरे

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत राजकारणामुळे दुर्लक्षित राहीलेले विनोद तावडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी आज नियुक्ती केली. या पदावर विराजमान होणारे तावडे हे महाराष्ट्रातील भाजपाचे दुसरे नेते ठरले आहेत. यापूर्वी या पदावर स्व. प्रमोद महाजन यांनी काम पाहिले होते. त्यांच्यानंतर …

Read More »

आता मलिकांच्या मुलींनी प्रसिध्द केली वानखेडेच्या पहिल्या लग्नाची पत्रिका आणि दाखला ट्विट करत लग्नपत्रिका आणि साक्षीदारांच्या सहिचे प्रमाण पत्र बाहेर

मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी या आधी अनेक गौप्यस्फोट करत एकच खळबळ उडवून दिलेली असतानाच आता मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाची लग्न पत्रिका आणि त्यावेळी साक्षीदारांनी केलेल्या सह्यांचे प्रमाण पत्रच ट्विटरवरून …

Read More »

सरकारी खर्चाने शेतक-यांना मिळणार ठिबक सिंचन ते ही इतक्या अनुदानावर ७५ आणि ८० टक्के अनुदान मिळणार-कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शेतक-यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतक-यांना ४५ टक्के अनुदान (केंद्र हिस्सा ६० टक्के …

Read More »

आर्यन खानप्रकरणातील समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा उघड हायकोर्टाच्या निकालानंतर नवाब मलिक यांनी अशा भ्रष्ट अधिकार्‍याला निलंबित करण्याची केली मागणी

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. आज हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. …

Read More »

इन्कम टॅक्स रिटर्न भरणे का गरजेचे? जाणून घ्या फायदे या ८ गोष्टींसाठी आयटी रिटर्नचे फायदे होवू शकतात

मुंबई: प्रतिनिधी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर आयटीआर भरल्यास दंड द्यावा लागेल. तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला आयटीआर भरणे बंधनकारक आहे. आयटीआर भरण्याचे फायदेही अनेक आहेत. आयकर रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही कर देत नाही. मात्र, उत्पन्नाचा एक ठोस …

Read More »

कृषी कायदे मागे: सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई: प्रतिनिधी कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. …

Read More »