Breaking News

दानवेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधींना दिली या प्राण्याची उपमा देवाला सोडलेला वळू म्हणाल्याने राजकारणात उमटले पडसाद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वादग्रस्त भाजपा नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्यास सुरुवात झाली. जन आर्शिवाद यात्रा बदनापूर येथे पोहोचली असता त्यांनी काँग्रेसचे माझी अध्यक्ष तथा नेते राहुल गांधी म्हणजे देवाला सोडलेला वळू म्हणत नवा राजकिय वाद निर्माण केला …

Read More »

प्रबोधनकारांच्या वाक्याचा संदर्भ देत राज ठाकरेंचे ते ट्विट नेमके कोणासाठी राज ठाकरेंच्या दृष्टीने बांडगुळ नेमके कोण?

मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीय द्वेष निर्माण झाल्याचा जाहिर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजना प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचण्याचा सल्ला दिला. त्यानंतर राज यांनी पवारांना प्रतित्तुर देत त्यांच्या वाक्यातील शब्दांचा अर्थ समजावून सांगावे असे आव्हान दिल्याला २४ …

Read More »

रायगड जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासह ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कल्याणकर रायगडचे जिल्हाधिकारी तर वारभुवन आदिवासी विभागात

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने आज पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. ज्या आयएएस अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यामध्ये पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत चांगले काम करूनही रायगडच्या जिल्हाधिकारी यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना आयटी विभागाच्या संचालक पदावर नियुक्त …

Read More »

भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराचे केंद्र महागाई, इंधन दरवाढीचे खापर काँग्रेसवर फोडून भाजपाकडून जनतेची दिशाभूल-नाना पटोले

पुणे: प्रतिनिधी पुणे, पिंपरी चिंचवड असो वा दिल्ली भारतीय जनता पक्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. भाजपाने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून आरोप मात्र ते दुसऱ्यांवर करत आहेत. त्यांच्याच आशिर्वादाने स्वीस बँकेतील भारतीयांचा काळा पैसाही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टचारी वृत्तीमुळेच देश रसातळाला गेला असून भाजपा हा …

Read More »

संभाजीराजेंचा गौप्यस्फोट, “अरे कुठली खासदारकी दिली सोडून, म्हणून बाहेर पडणार होतो” पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणून देवू नका

नांदेड: प्रतिनिधी मराठा समाजाने आपल्या आरक्षण मागणीसाठी भरपूर आंदोलने केली. पण त्यात दिलेल्या शब्दांना सरकार फिरले. राज्यसभेत मला समाजाविषयी बोलण्याची संधी मागितल्यावर सुध्दा दिली नाही म्हणून मी खासदारकी सोडायची तयारी केली. पण आपल्या राज्यातल्या खासदारांमुळे मला त्यावेळेस बोलण्याची संधी मिळाल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे राज्यसभेतील खासदार तथा मराठा समाजाचे नेते संभाजीराजे यांनी …

Read More »

ज्या स्व. बाळासाहेबांनी विरोध केला त्यांच्याच चिंरजीवांनी सत्तेसाठी गुडघे टेकले भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या भाजपा विरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून आपण सत्तेसाठी किती अगतिक आहोत हेच दाखवून दिले असून काँग्रेसपुढे गुडघे टेकून महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकणाऱ्या शिवसेनेने राज्याच्या विकासाला वेठीस धरू नये, अशी टीका भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी …

Read More »

शरद पवारांना राज ठाकरेंचे प्रतित्तुर म्हणाले, अर्थ समजावून सांगा पुण्यातील मुलाखतींचा संदर्भ देत पत्रकार परिषदेत दिले उत्तर

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातींचं राजकारण, त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढल्याचा जाहीर आरोप राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रबोधनकारांच साहित्य वाचण्याचा सल्ला दिला. पवारांच्या त्या सल्ल्यावर राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो …

Read More »

आता तिसऱ्या लाटेलाही भाजपा कारणीभूत ठरणार निवडणूका येत - जात राहतील परंतु लोकांचे जीव महत्वाचे- नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. देशभर यात्रेच्या नावाखाली गर्दी जमवली जात आहे. दुसऱ्या लाटेच्यावेळी निवडणुकीसाठी अफाट गर्दी जमवल्याने हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला याला भाजपा कारणीभूत होती ही सत्य परिस्थिती आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …

Read More »

केंद्रीय मंत्री गडकरींच्या त्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले हे उत्तर सिताबर्डी-झिरो माईल फ्रीडम पार्क- कस्तुरचंद पार्क सेक्शन मेट्रो मार्गाचे उद्घाटन

नागपूर : प्रतिनिधी रस्ते बांधणीच्या कामात शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधीकडून अडथळा आणला जात असल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित याबाबतची नाराजी व्यक्त करत रस्ते विकासाच्या कामांना मंजूरी देताना विचार करावा लागेल असा गर्भित इशारा दिला. त्याच पत्राचा धागा पकडत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नितीनजी तुम्ही …

Read More »

शांघायमधील आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठी राज्यातील २२ हजार जण मैदानात पुर्वतयारीसाठी आयोजित स्पर्धेत २२ हजार युवक-युवतींचा सहभाग- नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी शांघाय (चीन) येथे पुढीलवर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची राज्यातील उमेदवारांना संधी उपलब्ध झाली असून या स्पर्धेमध्ये निवडीसाठी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या …

Read More »