कोल्हापूरः प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात ६ ऑगस्टला होणार असून शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरपासून सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. ही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्टला राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. शिवस्वराज्य …
Read More »८० वर्षे वयावरील सेवानिवृत्तीधारक, निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी शासनाने ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ज्या महिन्यात त्यांची वयाची ८०/८५/९०/ आणि १०० वर्षे पूर्ण होतात त्या महिन्याच्या १ तारखेपासून वाढीव दराने निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वय वर्षे ८० ते ८५ …
Read More »राज्यातील साडेचार लाख विद्यार्थ्यांची ईबीसी सवलतीची निम्मी फी भरली ६५० कोटीची रक्कम जमा केल्याची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
कोल्हापूर : प्रतिनिधी राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत योजनेची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये केल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले आहे. या योजनेनुसार गेल्या वर्षी राज्य शासनाने राज्यातील ४ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांची निम्मी म्हणजे ५६० कोटीची फी भरल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे …
Read More »हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन १५ नोव्हेंबरपासून प्राथमिक फेरी सुरु होणार
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या १५ नोव्हेंबर २०१९ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून १ ते ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. ५९ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबर, २०१९ पासून राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात …
Read More »मध्य- हार्बर रेल्वे सेवा ठप्प सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची रेल्वे प्रशासनाकडून माहिती
मुंबईः प्रतिनिधी मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला असून कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. तसेच पावसामुळे कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवरील सायन, कुर्ला रेल्वे स्थानक तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला-वडाळा स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले …
Read More »मुंबई उपनगरवासिंयांना पावसाने घरात कोंडले शुक्रवारी रात्रीपासून सततच्या मुसळधार पाऊस अद्यापही सुरुच
मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-विरारः प्रतिनिधी मुंबईसह उपनगरांतील कल्याण, डोंबिवली, विरार, वसई आणि नवी मुंबई परिसरात पावसाची जोरात बॅटिंग सुरु आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरांमधल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडून मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होवू लागल्याने उपगनरात राहणाऱ्या अनेक चाकरमान्यांना अक्षरक्ष घरात कोंडल्याची परिस्थिती पाह्यला मिळाली. तसेच मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील अनेक लोकल गाड्या …
Read More »२६,२७ जुलैला पावसामुळे परिक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांच्या फेर परिक्षा होणार शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड आशिष शेलार यांचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी 26 व 27 ऑगस्ट दरम्यान बदलापूर, कर्जत या भागात संततधार पावसामुळे वाहतूक कोंडीमुळे काही विद्यार्थी वेळेत परीक्षेला पोहोचू शकले नाहीत. त्यामधे दहावी, विज्ञान भाग 2, इतिहास, समाजशास्त्र 12 वी समाजशास्त्र, बालविकास सहकार, टंकलेखक, लघुलेखक यापैकी ज्या परिक्षांना बसता आले नाही अशा या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसातील परीक्षेचे पेपर ही …
Read More »आरक्षण कपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू भाजप-शिवसेना सरकारने ओबीसींच्या हक्कांवर गदा आणल्याचा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी इतर मागासवर्गीयांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असलेल्या सध्याच्या २७ टक्के आरक्षणात बदल करून त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. हा आरक्षण कपातीचा निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतींमध्ये …
Read More »अ.भा. साहित्य महामंडळाच्या खात्यात ५० लाख रूपये जमा आचारसंहिता नको म्हणून आधीच साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध
मुंबईः प्रतिनिधी उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य शासनाने दरवर्षीप्रमाणे रुपये ५० लाख इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी मंजूर करण्यात आलेले अर्थसाहाय्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ३० जुलै, २०१९ रोजीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बँक …
Read More »निवडणूक न लढविणारे ईव्हीएमवर बोलतायत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचा राज ठाकरेंना टोला
मुंबईः प्रतिनिधी जे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत, ते आता कोलकात्यापासून लोकांच्या फ्लॅटवर जाऊ लागले आहेत. या पत्रकार परिषदेतील काही नेते ईव्हीएम बाबत बोलत आहेत. त्यांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही त्यांनी आधी निवडणूक लढवून दाखवावी. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत ज्यांनी निवडणूकच लढविली नाही त्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya