पंतप्रधान मोदी राष्ट्राला संबोधित करताना म्हणाले, जीएसटी बचत उत्सव ३१८ वस्तूं जीएसटी कराखाली

“उद्यापासून, राष्ट्र जीएसटी बचत उत्सव साजरा करेल. तुमची बचत वाढेल आणि तुम्ही तुमच्या आवडत्या वस्तू खरेदी करू शकाल. या सुधारणेचा फायदा समाजाच्या प्रत्येक वर्गाला होईल,” असे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटले.

या सुधारणेच्या केंद्रस्थानी वस्तू आणि सेवा कर रचनेचे व्यापक सरलीकरण आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जीएसटी कौन्सिलने ५ टक्के आणि १८ टक्के अशा दोन स्तरीय सुव्यवस्थित दर प्रणालीला मान्यता दिली, जी २२ सप्टेंबरपासून नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होणार आहे.

पूर्वी १२ टक्के कर आकारण्यात येणाऱ्या जवळपास ९९ टक्के वस्तू आता ५ टक्के कर आकारण्यात येतील, तर पूर्वी २८ टक्के कर आकारण्यात येणाऱ्या सुमारे ९० टक्के वस्तू १८ टक्क्यांपर्यंत खाली येतील. तथापि, ४० टक्के भरपाई उपकर लक्झरी आणि हानिकारक वस्तूंवर लागू राहील.
पंतप्रधानांनी केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांना श्रेय दिले की, त्यांनी देशाला डझनभर वेगवेगळ्या करांच्या ओझ्यातून मुक्त केले आणि “एक राष्ट्र, एक कर” चे स्वप्न प्रत्यक्षात आणले.

पंतप्रधान मोदी यांनी आठवण करून दिली की, २०१४ पूर्वी, व्यवसाय आणि नागरिक एकाच वेळी वाढत्या कर आकारणीच्या चक्रव्यूहात अडकले होते, ज्यामुळे खर्च वाढला आणि घरगुती बजेट ताणले गेले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “त्या वेळी, लाखो देशवासीयांसह लाखो कंपन्यांना विविध करांच्या चक्रव्यूहामुळे दैनंदिन समस्यांना तोंड द्यावे लागत होते. एका शहरातून दुसऱ्या शहरात वस्तूंची वाहतूक करण्यासाठी होणारा वाढता खर्च गरिबांवर सोसावा लागत होता आणि तुमच्यासारख्या ग्राहकांनाही त्यावर शुल्क आकारले जात होते. देशाला या परिस्थितीतून मुक्त करणे आवश्यक होते,” असे सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, या सुधारणा आता लोकांसाठी “दुहेरी वरदान” म्हणून काम करतील, ज्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार नाहीत तर घरातील लोकांच्या हातात अधिक बचत देखील होईल.

पंतप्रधान मोदी यांनी नवीन जीएसटीला या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय अर्थसंकल्पातील १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याच्या निर्णयाशी जोडले, जे भारतातील वाढत्या मध्यमवर्गावरील भार कमी करण्याच्या उद्देशाने एक पाऊल आहे.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “१२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सवलत दिली जाते, तेव्हा मध्यमवर्गाच्या जीवनात मोठा बदल होतो, ज्यामुळे खूप साधेपणा आणि सुविधा निर्माण होतात. आता, गरीब, नव-मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गाला दुहेरी वरदान मिळत आहे. जीएसटीमध्ये कपात केल्याने, देशातील नागरिकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल,” अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

गेल्या अकरा वर्षांत, २५ कोटी भारतीय गरिबीतून बाहेर पडले आहेत, ज्यांचे वर्णन त्यांनी स्वतःच्या आकांक्षा असलेला गतिमान नव-मध्यमवर्ग म्हणून केले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की सरकारचे दोन निर्णय, आयकर सवलत आणि जीएसटी सुधारणा, यामुळे देशातील लोकांचे एकाच वर्षात २.५ लाख कोटी रुपयांहून अधिक बचत होईल.

पंतप्रधान मोदी यांनी अतिथी देवो भव वाक्य बदलत “आपण नागरिक देवो भव” या वाक्याचे पालन करून पुढे जात आहोत आणि त्याचे प्रतिबिंब आपल्याला पुढील पिढीच्या जीएसटी सुधारणांमध्ये दिसून येते,” असे सांगत सरकारच्या आर्थिक धोरणांना चालना देणाऱ्या नागरिक-प्रथम तत्वज्ञानावर भर देत असल्याचे सांगितले.

गोंधळलेली कर व्यवस्था उलथवून टाकून, पंतप्रधान मोदींनी असे प्रतिपादन केले की जीएसटी २.० व्यवसाय करणे सोपे करेल, अधिक गुंतवणूक आकर्षित करेल आणि एक निष्पक्ष बाजारपेठ निर्माण करेल.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “या सुधारणा भारताच्या विकासाच्या कथेला गती देतील, व्यवसाय सुलभ करतील आणि प्रत्येक राज्य विकासाच्या प्रवासात समान भागीदार बनेल,” असे सांगितले, तसेच कर सुधारणा ही आर्थिक गरज आणि एकसंध राष्ट्रीय टप्पा दोन्ही आहे.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदींनी स्वदेशीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन पुन्हा केले, नागरिकांना स्वावलंबी होण्याचे आणि परदेशी बनावटीच्या वस्तूंवरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आपल्या खिशातील कंगवा भारतात बनवला जातो की नाही हे आपल्याला माहित नाही. आपल्याला भारतात बनवलेले उत्पादने खरेदी करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला प्रत्येक घराला स्वदेशीचे प्रतीक बनवण्याची आवश्यकता आहे. गर्व से कहो ये स्वदेशी है,” असे ते म्हणाले.

जीएसटी २.० ला त्यांच्या सरकारच्या आत्मनिर्भरता अजेंडाशी जोडताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्याला स्वदेशीच्या मंत्राने बळ मिळाले, त्याचप्रमाणे देशाच्या समृद्धीलाही स्वदेशीच्या मंत्रानेच शक्ती मिळेल. घरातील आणि दुकानदारांना स्वदेशी उत्पादने स्वीकारण्याचे आवाहन केले: “आपल्याला प्रत्येक घराला स्वदेशीचे प्रतीक बनवायचे आहे, प्रत्येक दुकानाला स्वदेशीने सजवायचे असल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारांना आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीच्या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले, ज्यामुळे देशभरात गुंतवणुकीसाठी आणि उत्पादनाला चालना मिळण्यासाठी वातावरण निर्माण होईल. “जेव्हा राष्ट्र आणि राज्ये एकत्र काम करतील तेव्हा आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल,” असेही यावेळी शेवटी सांगितले.

About Editor

Check Also

100 percent direct approval for foreign investment in the insurance sector.

एफडीआय: विमा क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला १०० टक्के थेट मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी एका महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांचा भाग म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *