अबब…कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत २४३ रुग्ण आतापर्यत ७१ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिझी
मुंबई महानगरपालिका हद्दीत ज्या पध्दतीने रूग्ण संख्या वाढत आहेत. त्याच पध्दतीने आज कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत २४३ रूग्णांचे आज निदान झाले आहे. विशेष म्हणजे मागील दिवसापासून महापालिकेकडून सातत्याने घरोघरी जावून नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम करत असताना २४ तासात इतक्या मोठ्या प्रमाणावर रूग्णांचे निदान झाले.
आतापर्यंत १८४८ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १३३८ रुग्ण बरे होवून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर आतापर्यंत ७१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदानावरही विशेष लक्ष द्या 'एनसीआय'मध्ये 'ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स' परिषदेचे उद्घाटन

गेल्या दशकभरात कर्करोगाच्या घटनांमध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. भारतासारख्या देशाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *