मुंबई

केंद्र सरकारने आश्वासन देऊनही अंधेरीतील कामगार हॉस्पिटल अद्याप बंदच अंधेरीतील कामगार हॉस्पिटल सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका :- राजेश शर्मा

अंधेरी येथील अद्ययावत कामगार हॉस्पिटल मागील चार वर्षांपासून बंद असल्याने ते सुरु करावे यासाठी शासनाकडे प्रयत्न करण्यात आले. यासंदर्भात केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने एक बैठकही घेतली होती तरिही अद्याप काहीच हालचाल झाल्याचे दिसत नाही. लाखो कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा आरोप, लोकप्रतिनिधी नसताना ४८ टक्के जास्तीच्या दराने निविदा.. फक्त पाचच कंत्राटदारांना निविदांचे वाटप, निविदेत अनेक नियमांचा समावेश नाही

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील जवळपास ४०० किमीचे रस्ते सिमेंटचे बनविणार असल्याची घोषणा करत ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार असल्याचे जाहिर केले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे ही कामं अद्यापही सुरू झाली नसून या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे …

Read More »

टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, …

Read More »

सटाण्याच्या माजी नगराध्यक्षांसह नाशिक जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांमुळे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपाकडे ओढा वाढला आहे, असे प्रतिपादन भारतीय़ जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलते होते. खा.सुभाष भामरे, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी यावेळी उपस्थित …

Read More »

झाडं तोडण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारत मेट्रो कार्पोरेशनला केला १० लाखाचा दंड मेट्रो रेल कार्पोरेशनला अधिकची झाडं तोडण्यास केली मनाई

मुंबईतल्या आरे कॉलनीतील वृक्ष तोड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही तुम्हाला ८४ झाडं तोडण्याची संमती दिली होती. तरीही मेट्रो रेल कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरणाकडे जाऊन न्यायालयाचा अपमान केला असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. तसंच न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून आणखी झाडं तोडल्याप्रकरणी मुंबई मेट्रोला …

Read More »

मुंबई महापालिकेबाबत घेतलेला शिंदे-फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णय न्यायालयाने केला मान्य पालिकेच्या हद्दीत २२७ सच वार्ड

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुंबईतील वार्ड संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला. मात्र त्यानंतर काही महिन्यातच राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस यांचे भाजपाचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा निर्णयात बदल करत मुंबई महापालिकेच्या वार्ड संख्येत केलेली वाढ पुन्हा रद्दबादल करत २३६ वरून २२७ इतकी करण्यात आली. या …

Read More »

भर उन्हात कार्यक्रम कोणाच्या सांगण्यावरून? उदय सामंत म्हणाले, त्यांच्याशी चर्चा करूनच वेळ ठरविली… कार्यक्रमाची वेळ हुकूमशाही पध्दतीने ठरविली नव्हती

अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असताना २०२२ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार श्री परिवाराचे प्रमुख डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहिर करण्यात आला. त्यानंतर लगोलग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर पुन्हा ऐन उन्हाळा सुरु झालेला असताना खारघर येथे पुरस्कार …

Read More »

१३ जणांचे बळी गेल्यानंतर महाराष्ट्र भूषण डॉ धर्माधिकारी यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना घडलेली घटना अत्यंत क्लेशदायक

ऐन एप्रिलमध्ये बदलेल्या वातावरणामुळे नैसर्गिक तापमानात सातत्याने बदल घडून येत असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतरही नवी मुंबईतील खारघर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याला उपस्थित राहीलेल्या श्री सेविकांना उष्माघाताने त्रास होऊ लागला. त्यामुळे काल रात्रीत ११ श्री सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर आज दिवसभरात आणखी दोघांची वाढ होत ही संख्या १३ …

Read More »

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट, उष्माघाताने ७ ते ८ जणांचा मृत्यू एमजीएम रूग्णालयात झाला मृत्यू, मृतांमध्ये महिला, लहान मुलं आणि पुरुषांचा समावेश

मागील वर्षीचा २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आज सकाळी खारघर येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बोलावित आणि तब्बल महाराष्ट्रातील सर्वच टोल नाक्यांवर टोलमाफी देत जवळपास लाखो लोकांच्या उपस्थित ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आज ( १६ एप्रिल …

Read More »

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली- केंद्रीय मंत्री अमित शहा

वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दांत …

Read More »