मुंबई

बीकेसीतील ‘वज्रमुठ’ सभेसाठी काँग्रेसच्या या ६ नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी महाराष्ट्र दिनी जंगी सभेसाठी सोपविली जबाबदारी

महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेच्या माध्यमातून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले असून मुंबईतील बीकेसी मैदानावर सोमवार १ मे रोजी महाराष्ट्र दिनी विशाल वज्रमूठ सभा होत आहे. या सभेच्या नियोजनात काँग्रेस पक्षही मोठ्या ताकदीने कामाला लागला असून सभा यशस्वी करण्यासाठी सहा नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा खुलासा, कोणताही अन्य डेटा लिक नाही सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास …

Read More »

कल्याण आयुक्त रविराज इळवे यांना तातडीने निलंबित करा काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

राज्यातील कल्याण निधी भरणाऱ्या ४ कोटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना गुणांना वाव देण्यासोबतच त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी याकरिता विविधांगी कल्याणकारी उपक्रम, योजना राबवण्याकरिता कामगार कल्याण मंडळाची निर्मिती झाली आहे. परंतु मंत्रालयातील कामगार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हाताशी धरून कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार …

Read More »

त्या १४ जणांचा शवविच्छेदन अहवाल बाहेर, ते मृत्यू…. या निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत कोण?

हवामान खात्याने तापमान वाढीचा इशारा दिलेला असतानाही राज्य सरकारकडून ऐन उन्हाच्या तडाख्यात निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना १६ एप्रिलला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …

Read More »

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागरी सेवा दिन साजराः या अधिकाऱ्यांचा सन्मान प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीर

“सर्वसामान्य माणसाचे समाधान हा राज्य शासनाचा प्राधान्यक्रम असून, त्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविण्यावर भर द्यावा तसेच त्याची पारदर्शी पद्धतीने अंमलबजावणी करावी. प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी शासन नेहमीच खंबीर असेल’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्र्याच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील १३ …

Read More »

केंद्र सरकारने आश्वासन देऊनही अंधेरीतील कामगार हॉस्पिटल अद्याप बंदच अंधेरीतील कामगार हॉस्पिटल सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका :- राजेश शर्मा

अंधेरी येथील अद्ययावत कामगार हॉस्पिटल मागील चार वर्षांपासून बंद असल्याने ते सुरु करावे यासाठी शासनाकडे प्रयत्न करण्यात आले. यासंदर्भात केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने एक बैठकही घेतली होती तरिही अद्याप काहीच हालचाल झाल्याचे दिसत नाही. लाखो कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा आरोप, लोकप्रतिनिधी नसताना ४८ टक्के जास्तीच्या दराने निविदा.. फक्त पाचच कंत्राटदारांना निविदांचे वाटप, निविदेत अनेक नियमांचा समावेश नाही

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील जवळपास ४०० किमीचे रस्ते सिमेंटचे बनविणार असल्याची घोषणा करत ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार असल्याचे जाहिर केले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे ही कामं अद्यापही सुरू झाली नसून या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे …

Read More »

टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, …

Read More »

सटाण्याच्या माजी नगराध्यक्षांसह नाशिक जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांमुळे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपाकडे ओढा वाढला आहे, असे प्रतिपादन भारतीय़ जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलते होते. खा.सुभाष भामरे, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी यावेळी उपस्थित …

Read More »

झाडं तोडण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारत मेट्रो कार्पोरेशनला केला १० लाखाचा दंड मेट्रो रेल कार्पोरेशनला अधिकची झाडं तोडण्यास केली मनाई

मुंबईतल्या आरे कॉलनीतील वृक्ष तोड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही तुम्हाला ८४ झाडं तोडण्याची संमती दिली होती. तरीही मेट्रो रेल कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरणाकडे जाऊन न्यायालयाचा अपमान केला असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. तसंच न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून आणखी झाडं तोडल्याप्रकरणी मुंबई मेट्रोला …

Read More »