केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय जहाज व परिवहन सचिव सुधांश पंत, मुंबई …
Read More »मागासवर्गीय विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी आयआयटीच्या संचालकाची हकालपट्टी करा सीबीआय चौकशीची भीम आर्मीची मागणी
पवई येथील आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याने आत्महत्या केली असून आत्महत्ये प्रकरणी आयआयटीच्या संचालकांची हकालपट्टी करण्यात यावी आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भीम आर्मीने आज पवई येथील आयआयटीवर धडक मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली. या संस्थेतील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून सबंधितांवर कारवाई करावी यासाठी मंत्रालयावर धडक …
Read More »वाचा, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आहे काय खास, कोणत्या सुविधा आहेत यात? फडणवीस म्हणाले, रेल्वे आधुनिकीकरण- विस्तारीकरणासाठी पंतप्रधानांचे योगदान महत्वपूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये राज्यातील १२४ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. नाना शंकरशेठ यांनी पहिली रेल्वे सुरू केली होती आणि त्याची नोंद इतिहासात घेतली गेली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे आधुनिकीकरण आणि …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पातील भरीव निधीमुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा
नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिंचन, रस्ते प्रकल्प, कृषी, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, स्टार्टअप, …
Read More »मत्स्य व्यवसाय मंत्री मुनगंटीवार म्हणाले, मच्छीमार बांधवांना सक्षम करणार राज्यातील मच्छीमारांच्या होडी आणि जाळीच्या अनुदानात लक्षणीय वाढ
सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या बळ देण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल; यासाठी लहान मच्छिमारांना व रापणकारांना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तयार जाळी खरेदी व बिगर यांत्रिकी नौका बांधणीच्या अनुदानात लक्षणीय वाढ करण्याचा …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतिक मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा
रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर …
Read More »आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात दुचाकी स्वाराचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा जोडीदार गंभीर जखमी झाला आहे. सांगोला तालुक्यातील माळवाड-नाझरे दरम्यान गुरूवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. अशोक नाना वाघामारे (वय ५०, रा. माडगुळे, ता. आटपाडी, जि.सांगली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव …
Read More »मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलाच्या रुंदीकरणामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सीमेवरील वाहतूक कोंडी दूर होऊन ती सुरळीत होणार आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत …
Read More »मुंबई पोलिसांकडून शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी मुंबईत शस्त्रास्त्रे, हत्यार, स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत ५ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये शस्त्रास्त्रे, हत्यार, संक्षारक पदार्थ किंवा स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत ५ मार्चपर्यंत कलम ३७ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत. बृहन्मुंबईचे पोलिस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले असून कलम 37 चे उप कलम (1) …
Read More »मुख्यमंत्री फेलोशिपसाठी या तारखेपर्यंत अर्ज करा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे …
Read More »
Marathi e-Batmya