देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवतांना सरन्यायाधीश श्री. गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी राज्याचे कौशल्य विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे …
Read More »सरन्यायाधीश भूषण गवई यांची स्पष्टोक्ती, डॉ आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे अनावरण
विविध विषयांचे अभ्यासक व तज्ञ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधीज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. शासकीय विधी महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्य, कारकीर्दीला …
Read More »दादासाहेब फाळके चित्रनगरीतील निकृष्ट कामाचे अखेर त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण डेमोक्रॅटिक आरपीआयच्या आंदोलनाची दखल
मराठी भाषा दिनी मोठ्या दणक्यात खर्च करून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उदघाटन केलेल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओला अवकाळी पावसातच लागलेल्या गळती प्रकरणाचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्यवस्थापनाच्या या आदेशनानंतर या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या डेमोक्रॅटीक आरपीआयने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. …
Read More »स्वतःला कोंडून रहात असलेल्या नवी मुंबईतील प्रोगामरची सीलने केली सुटका कुटुंबियांचा मृत्यू, मोठ्या भावाची आत्महत्या त्यामुळे कोंडून घेतले होते
नवी मुंबईतील एका ५५ वर्षीय व्यक्तीला गेल्या आठवड्यात त्याच्या अपार्टमेंटमध्ये तीन वर्षांहून अधिक काळ स्वतःला कोंडून ठेवल्यानंतर, आणि बाहेरील जगापासून पूर्णपणे अनभिज्ञ राहिलेल्या एकाची सुटका करण्यात आली. अनुप कुमार नायर असे या व्यक्तीचे नाव आहे. तो गंभीर नैराश्याने ग्रस्त होता आणि मानसिक आघात आणि नैराश्यामुळे त्याने स्वेच्छेने स्वतःला कोंडून घेतले …
Read More »धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली अदानीसाठी पुन्हा सवलत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष हेतू कंपनीस भाडेपट्टा कराराच्या मुद्रांक शुल्क माफ
धारावी पुनर्विकासाची निविदा जाहिर केल्यापासून अनेक विशेष अटी आणि नियमात दुरुस्ती करत अनेक सवलती राज्य सरकारकडून अदानी कंपनीसाठी जाहिर केल्या. इतकेच नव्हे तर अदानीने धारावीच्या पुनर्विकासासाठी एखाद्या मागणी प्रशासनासमोर ठेवल्यास त्यास सात दिवसाच्या आत किंवा विहित कालावधीत संबधित प्रशासनाने मान्यता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मिठागरांच्या जमिनी, मदर डेअरीची …
Read More »मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे आदेश, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे
राज्यात मागील काही दिवसात घडलेल्या विविध दुर्घटना आणि त्यात झालेले नागरिकांचे मृत्यू हे अतिशय दुर्दैवी आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले. रेल्वे प्रवासात होणाऱ्या दुर्घटना टाळण्याकरिता प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना त्यांनी केली. मुंबईत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामांचा घेतला आढावा
मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये डोंगरांवर बऱ्याच झोपडपट्ट्या आहेत. अशा झोपडपट्ट्या पावसाळ्याच्या दिवसात भूस्खलन तसेच दरड कोसळल्यास धोकादायक ठरतात. डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत पात्र झोपडपट्टी धारकांचे त्यांच्या सध्याच्या निवासाच्या नजिकच पुनर्वसन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा आढावा बीडीडी चाळीच्या सदनिकांचे हस्तांतरणाचे नियोजन
विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा यासह म्हाडाच्या विविध अधिनियम अंतर्गत प्रस्तावित सुधारणांचा तसेच म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगर विकास …
Read More »एमएमआरमध्ये एकात्मिक बस वाहतुकीसाठी टास्क फोर्स बेस्टचे महाव्यवस्थापक टास्क फोर्सचे अध्यक्ष
महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) साठी एकात्मिक बस वाहतूक योजना तयार करण्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्याचा उद्देश प्रवाशांना एकाच तिकीट प्रणालीद्वारे अखंड प्रवास अनुभव प्रदान करणे आहे. महाव्यवस्थापक बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वितरण लिमिटेड (पश्चिम), मुंबई यांना टास्क फोर्सचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. हे टास्क …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीला आणखी १३ लाख चौरस फूट जागेचा TDR देण्याचा घाट भाजपा युती सरकार पंतप्रधानांच्या मित्रासाठी सरेंडर, म्हाडाने बांधलेल्या इमारतींचा फायदाही अदानीलाच?
अदानीचा एक लाख कोटी रुपयांचा धारावी विनाश महाघोटाळा दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करत आहे. या महाघोटाळ्याचा नवा अध्याय म्हणजे, अदानी सरकार अदानीला तब्बल १३.३९ लाख चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र (sale incentive area) TDR स्वरूपात गिफ्ट देऊ इच्छित आहे. ते पण अशा पुनर्वसन घरांसाठी/ गाळ्यांसाठी, जे अदानीने बांधलेले देखील नाहीत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा …
Read More »
Marathi e-Batmya