मुंबई

शिवनेरी बसच्या धडकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पीआर टीममधील एकाचा मृत्यू फुलं आणण्यासाठी गेलेल्या प्रणय बोडके याच्यासह तिघांचा मृत्यू

होळी सणाच्या पुजेसाठी फुलं आणण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या तीघांचा चुकीच्या मार्गावरून जाणाऱ्या शिवनेरी बसने धडक दिल्याने झालेल्या या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पीआर टीम मधील एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात आणखी दोघेजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त पुढे आले आहे. ही घटना रात्री उशीरा प्रभादेवी येथे घडली. बुधवारी …

Read More »

मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार व कोळी भवन उभारावे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे याचे निर्देश

दुबई आणि सिडनीच्या धर्तीवर अंधेरी पुर्व  येथील मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार आणि कोळी भवन उभारण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्रालय येथे  बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मरोळ  येथे मच्छिमार बांधवासाठी कोळी भवन व  आंतराराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार व मच्छिमार समस्यांची आढावा …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, मीरा-भाईंदर न्यायालयासाठी अतिरिक्त जागा द्यायला शासन तयार मीरा- भाईंदर दिवाणी न्यायालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभहस्ते लोकार्पण

मीरा भाईंदर येथे नवीन दिवाणी न्यायालय तयार झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, यापुढे न्याय मिळवण्यासाठी ठाण्यापर्यंत पायपीट करावी लागणार नाही असे सांगत पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर न्यायदेवतेची प्रतिष्ठापना करण्याचे सौभाग्य लाभले असून या न्यायालयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना नक्की होईल असा विश्वास …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या प्रकल्पांचा घेतला आढावा हाजीअली येथे २ हजार क्षमतेचे वाहनतळ उभारा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे १ लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विधानभवनात झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी आराखडा तयार करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'परिवहन भवन’या नव्या इमारतीचे भूमिपूजन

राज्याच्या परिवहन विभागाला आधुनिक सुविधांनी युक्त मुख्यालय मिळावे, या दृष्टीने ८५ वर्षांनंतर नव्या परिवहन भवनाच्या उभारणीस सुरुवात होत आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच राज्यातील बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. १ मार्च ‘परिवहन दिन’ या दिवसाचे …

Read More »

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी आणि विजय वाकोडे मृत्यूप्रकरणी मंत्रालयावर मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन

शहिद सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय देण्यासाठी आज ३ मार्च सोमवार रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी मंत्रालयावर हजारोंच्या संख्येने राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भीमसैनिक आंबेडकरी समाज व संविधान प्रेमी नागरिक धडकणार असून सर्व …

Read More »

आशिष शेलार यांचे आवाहन, लोककला आणि नाटक याबाबत अधिक संशोधन करा भायखळा येथील नाट्य महोत्सवात केली

मराठी नाटकाची पायाभरणी विष्णुदास भावे यांनी केली यामध्ये काही दुमत नाही. पण त्यापुर्वी लोककला मधून नाटक या कलाकृतीचे काही संदर्भ सापडत असून त्याबद्दल लेखन आणि चर्चा सुरु आहेत. त्यामुळे याबाबत एक सर्वंकष अभ्यास आणि संशोधन होण्याची गरज आहे. या कामी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य …

Read More »

पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा माहिती तंत्रज्ञान मंत्री, ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन

सक्षम ‘SAKSHAM-2024-25’ हरित आणि स्वच्छ ऊर्जेद्वारे स्वच्छ वातावरण हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापरावर भर द्यावा. तसेच कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या पर्यावरण पूरक व्यवस्थेचा वापर करावा. असे आवाहन माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय समन्वयक, महाराष्ट्र पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू …

Read More »

२ मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “परिवहन भवन” चे भुमिपुजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

परिवहन विभागाचे (RTO ) मुख्यालय असलेल्या ” परिवहन भवन ” या नव्या इमारतीचे भूमिपूजन २ मार्च रोजी दुपारी २ वाजता सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. रस्ते वाहतुकीची नियमन करण्यासाठी …

Read More »

अनिल परब यांचा आरोप, बीएमसीच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या निविदेत ९० कोटींचा घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीकडून चौकशी सुरू असतानाही घोटाळा

बीएमसीमधील उघड भ्रष्टाचाराच्या आणखी एक उदाहरण समोर आले असून त्यात बीएमसीने प्रतिबंधात्मक पद्धती आणि निवडक अटी वापरून मिठी नदी गाळ काढण्याच्या निविदेत फेरफार केल्यामुळे बीएमसीचे ९० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, त्याचबरोबर एसआयटीकडून चौकशी सुरु असताना हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे विधान परिषदेतील गटनेते अनिल परब यांनी आज …

Read More »