पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१ मे २०२५) मुंबईत जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी भारतातील चित्रपट उद्योगातील सेलिब्रिटी आणि इतर कंटेंट निर्माते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांनी भारतात बनवलेल्या कंटेंटबद्दल आणि देशाला आर्थिक भरभराटीला नेण्यासाठी कंटेंट निर्मात्यांच्या क्षमतेबद्दल विस्तृतपणे सांगितले. पंतप्रधान मोदींनी नजीकच्या भविष्यात वेव्हज पुरस्कारांसारखे आणखी उपक्रम आयोजित करण्याचे आश्वासनही दिले.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, वेव्हज २०२५ ही भारतातील अशा प्रकारची पहिलीच शिखर परिषद आहे. या शिखर परिषदेत ४२ पूर्ण सत्रे, ३९ ब्रेकआउट सत्रे आणि प्रसारण, इन्फोटेनमेंट, एव्हीजीसी-एक्सआर, चित्रपट आणि डिजिटल मीडिया यासह विविध क्षेत्रांचा समावेश असलेले ३२ मास्टर क्लासेस असतील.
गुरुवार (१ मे २०२५) आणि शुक्रवारी (२ मे २०२५) पंतप्रधान मोदी महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (२ मे २०२५) केरळमधील विझिंजम आंतरराष्ट्रीय खोल पाण्याचे बहुउद्देशीय बंदराचे उद्घाटन करतील. आंध्र प्रदेशातील अमरावती जिल्ह्यात, पंतप्रधान मोदी ५८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सामग्री, सर्जनशीलता आणि संस्कृती हे ऑरेंज अर्थव्यवस्थेचे तीन आधारस्तंभ आहेत. भारतीय चित्रपटांची पोहोच आता जगाच्या कानाकोपऱ्यात विस्तारत आहे. आज, १०० हून अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांची वाढती संख्या सबटायटल्सद्वारे भारतीय सामग्रीशी जोडलेली असल्याचेही यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील ५ दिग्गज व्यक्तींवर स्मारक टपाल तिकिटे प्रकाशित केली.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेव्हज शिखर परिषदेत ‘सर्जनशील जबाबदारी’वर भर देत सांगितले की, आपल्याला तरुण पिढीला काही मानवताविरोधी विचारांपासून वाचवण्याची आवश्यकता आहे. जग कथा सांगण्याचे नवीन मार्ग शोधत असताना ‘भारतात निर्माण करा, जगासाठी निर्माण करा’ ही योग्य वेळ आहे, आहे. भारतात तयार केलेल्या सामग्रीबद्दल आणि देशाला आर्थिक भरभराटीला नेण्यासाठी सामग्री निर्मात्यांच्या क्षमतेबद्दल ही यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले की, सामग्री निर्मात्यांना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि ती स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांची सर्व ऊर्जा खर्च करण्याचे आवाहन केले. युवकांच्या कामाला मर्यादा नाही, संकोच आहे. मला तुमच्याशी सर्जनशील जबाबदारीबद्दल बोलायचे आहे. मानवी संवेदनशीलता आणि संवेदनशीलतेची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे. आम्हाला मानवांना समृद्ध करायचे आहे, त्यांना रोबोट बनवायचे नसल्याचेही यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी पुढे बोलताना सांगितले की, तंत्रज्ञानाच्या वेगाने हे होणार नाही. आपल्याला कलांना महत्त्व द्यावे लागेल आणि त्यांना बळकटी द्यावी लागेल. आम्हाला आपल्या तरुण पिढ्यांना मानवतावादाच्या विरोधात असलेल्या प्रवृत्तींपासून वाचवावे लागेल. निर्मात्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपले अॅनिमेटर्स जागतिक दूरदर्शींशी जोडले गेले पाहिजेत. मी सर्वांना, जगातील सर्व निर्मात्यांना, भारताला तुमचे कंटेंट प्लेग्राउंड बनवण्याचे आमंत्रण देतो, असे आवाहनही यावेळी केले.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी बाहेरून येणाऱ्या सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की जेव्हा तुम्ही येथे याल तेव्हा तुम्ही अगदी नैसर्गिकरित्या भारताशी जोडले जाल. भारत एक ऑरेंज इकॉनॉमी बनत आहे. आज, परदेशी ग्राहक भारतीय मनोरंजन उपशीर्षकांसह वापरत आहेत. स्क्रीनचा आकार लहान होत आहे, परंतु वापर वाढत आहे; संदेश मोठा होत आहे. जागतिक स्तरावर भारताच्या अन्नाला प्राधान्य दिले जात आहे. मला खात्री आहे की, भारतातील गाण्यांनाही पसंती मिळेल, अशी आशाही यावेळी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी पुढे बोलताना सांगितले की, संत्रा अर्थात ऑरेंज अर्थव्यवस्थेच्या भरभराटीच्या या काळात, मी तुम्हा सर्व कंटेंट क्रिएटर्सना सांगू इच्छितो की, तुम्ही भारताच्या सर्जनशीलतेला एक नवीन लाट आणत आहात. आमचे सरकार तुमच्या प्रयत्नांमध्ये तुमच्यासोबत आहे. स्किल इंडिया, स्टार्टअप सपोर्ट – प्रत्येक टप्प्यावर तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, ही वेळ आहे, भारतात निर्मिती करण्यासाठी, जगासाठी निर्मिती करण्यासाठी योग्य वेळ असल्याचेही यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बलताना म्हणाले की, आमचा खजिना विचार करायला लावणारा आणि खरोखरच जागतिक आहे. आमच्या कथांमध्ये विज्ञान, कल्पनारम्यता, धैर्य आहे. आमचा खजिना खूप समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. वेव्हजची मोठी जबाबदारी म्हणजे हे जगातील लोकांसमोर ठेवणे. आम्ही पद्म पुरस्कारांना लोकांच्या पुरस्कारांमध्ये रूपांतरित केले आहे. देशाच्या दुर्गम भागात काम करणाऱ्यांना आम्ही ओळखले. आणि ते लोकांनी मनापासून स्वीकारले आहे. पारसी, यहूदी येथे आले आणि आपल्या देशाचा भाग बनले. आपल्या संस्कृतीची ताकद म्हणजे इतर देशांच्या संस्कृतींचा आदर करणे, असेही यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी प्रत्येक स्पर्धकाला शुभेच्छा देत म्हणाले की, तुम्हाला जगात चमकण्याची संधी मिळाली आहे. भारत मंडपात, खूप नवीन गोष्टी आहेत. वेव्हज बाजार उपक्रम देखील मनोरंजक आहे. निर्मात्यांना प्रोत्साहन दिले जाईल आणि त्यांना सहकार्य मिळेल.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र दिना निमित्त मराठी भाषेत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Addressing the @WAVESummitIndia in Mumbai. It highlights India's creative strengths on a global platform. https://t.co/U4WQ4Ujv8q
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2025
Marathi e-Batmya