पंतप्रधान मोदींनाच आम्ही भीती दाखविणार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी
देशात सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विधेयकांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ लाख रूपये देण्यावरून जसे खोटे बोलले तसे ते आता याप्रश्नीही खोटे बोलत आहेत. या विधेयकावरून पंतप्रधान मोदी हे जनतेला भीती दाखवित आहेत. मात्र आता आम्ही त्यांना भीती दाखविणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
केंद्र सरकारच्या नागरीकत्वाशी संबधित सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी वंचित आघाडीकडून आज दादर टीटी येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरी आघाडीकडून दादर टीटी येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दोन लाखजण मावतील इतकं मोठ डिटेशन सेंटर बांधल जात असून तिथे जायच नसेल तर मोदी सरकार पाडा असे आवाहन करत हिंमत असेल, तर मला अटक करा असे आव्हानही त्यांनी केंद्र सरकारला दिले.
अनेक जणांकडे रहिवासी पुरावे नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत. सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार ४० टक्के हिंदू विरोधात असून त्यांच्याकडे कागदपत्रेच नाहीत. मग अशांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठविल जाणार आहे. त्यामुळे डिटेंशन सेंटर (छावणी केंद्र) उभारल्यास तोडून टाकू असा इशारा देत कायद्याला संघर्षाने उत्तर द्यावं लागतंय अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपचा कट देशात अराजकता माजविण्याचा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, नाशिक शहरातील मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार आडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’

नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *