अजून वेळ गेली नाही केंद्र सरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नवाब मलिक यांनी केंद्राला फटकारले...

मुंबई : प्रतिनिधी

अजून वेळ गेली नाही केंद्र सरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही शेती कायद्याला स्थगिती दिल्यानंतर नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही शेती कायद्याला स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्यादृष्टीने हे पहिले पाऊल आहे. केंद्र सरकारने अजूनही वेळ गेली नाही. सरकारने आडमुठेपणाचे धोरण सोडले पाहिजे. तिन्ही कायदे मागे घेऊन नव्याने कायदा करण्यासाठी प्रस्ताव तयार केला पाहिजे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे अशी आशाही त्यांनी यावेळी सांगितले.

 

About Editor

Check Also

मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश, पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये

राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन विभागाने काटेकोरपणे प्रसिद्धीचे नियोजन करावे. राज्यात, देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *