राजकारण

मुख्यमंत्र्यांनी आघाडीतील सहकारी पक्षांबरोबरच विरोधकांना केले हे आवाहन जनतेचे आरोग्य महत्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू, कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती बिघडवू शकते

मुंबई: प्रतिनिधी कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या …

Read More »

गायब अनिल देशमुखांबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत राज्याचा माजी गृहमंत्री अनेक महिन्यांपासून गायब आहे. महाराष्ट्राला ही गोष्ट भूषणावह नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गायब होण्याबाबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी भा जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये …

Read More »

पवारांनी कानपिचक्या देत केंद्राच्या कृषी धोरणाबाबत म्हणाले… आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच या दरम्यान एकमेंकाना “पाठीत खंजीर खुपसला”, “कोथळा बाहेर काढणारे” अशा शब्दांचा वापर सुरु झाल्या आहेत. त्यातच काल जुन्नर मध्ये संजय राऊत यांनी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर टोकाची टीका …

Read More »

अरे हे मंत्रिमंडळ आहे की,…. आमचं राष्ट्रवादीबद्दल काहीही म्हणणं नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका

पुणे : प्रतिनिधी राज्यातील एक मंत्री ईडीच्या रडार आहे, एक मंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा देवून बाहेर फिरतोय, एकजण करूणा मुंडे प्रकरणात मान खाली घालून फिरतोय, एका मंत्र्याबद्दल लूक ऑऊट नोटीस जारी झालीय, तर एकजण ईडी कारवाईपासून पळतोय, तर या सर्वांचे जे सगळं चालवितात त्या वाजेंद्र राऊतांचा बंगला पाडण्यात …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले विश्वासघातकींची सोबत नाही: राऊत तुमच्या दंडात ती ताकद नाही हम किसेको टोकेंगे नही अगर टोका तो छोडेगें नही शिवसेनेला पाटलांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी मोदींच्या नावावर मते मागूनही भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करणाऱ्यांना सोबत न घेता भाजपा एकट्याने मित्रपक्षासोबत निवडणूका लढवेल आणि जिंकेल असा विश्वास व्यक्त करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विश्वासघातकी म्हणून टीका करत संजय राऊत हे जी भाषा वापरत आहेत त्या पध्दतीचे शस्त्र …

Read More »

शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट, मी दिलेला शब्द पाळला राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर पवारांची स्पष्टोक्ती

पुणे : प्रतिनिधी राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जी यादी राज्यपालांना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांनी सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे. ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं, राज्यपालांकडे असा प्रस्ताव आम्ही दिलेला असून मी दिलेला शब्द पाळला …

Read More »

अतुल भातखळकर बेफाम खोटे बोलणाऱ्या भाजपा नेत्यांचे शिरोमणी कोरोना नसतानाही फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र उद्योगस्नेही मानकात अधोगती-सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात उद्योगस्नेही ( Ease of Doing business) मानकात महाराष्ट्र ५ व्या स्थानावर होता हा भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा दावा हास्यास्पद व वस्तुस्थितीला धरून नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र २०१५ साली ८ व्या स्थानी, २०१६ साली १० व्या स्थानावर तर …

Read More »

राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून पंतप्रधानांना महागाईचं रिटर्न गिफ्ट महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात महागाई विरोधात आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी देशातील आपल्या सर्व भगिनींना मोदीसरकारने गॅस सिलेंडरचे भाव २५ रुपयांनी वाढवत रक्षाबंधनाची ओवाळणी दिली होती याच प्रेमाखातर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पंतप्रधानांना रक्षाबंधनाचं आणि महागाईचं रिटर्न गिफ्ट म्हणून शेणाच्या गोवऱ्या आज पाठवत पुणे येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात पुणे येथे प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, देव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही… नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे करत आज मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत, देव केवळ मंदिरे आणि …

Read More »

ओबीसीप्रश्नी पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मात्र निशाणा या मंत्र्यांवर ओबीसींसाठींच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या शोधासाठी टास्कफोर्स स्थापणार का? मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ओबीसींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळातील दिग्गज मंत्र्यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळ उपस्थिती स्थापन केली. या समितीची स्थापना होवून एक वर्ष झाला असून या वर्षभरात ही समितीचं अदृष्य होवून हरवली असल्याने या उपसमितीच्या शोधासाठी एखाद्या टास्क फोर्सची स्थापना करणार की आम्ही प्रत्येक पोलिस ठाण्यात तशी तक्रार …

Read More »