राजकारण

काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन …

Read More »

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत महसूल परिषदेचा समारोप

महसूल विभाग राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता व तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून याची ओळख आहे. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणारा हा विभाग असून अधिक लोकाभिमुखतेसाठी महसूल परिषदेत अभ्यास गटांनी सादर केलेल्या शिफारशी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दिशादर्शक ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, सातत्याने क्राइम वाढतोय, लोकांना वर्दीची भिती नाही पुणे आणि बीडमधील परिस्थिती सारखीच

महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने क्राइम वाढतोय. त्यात पुणे जिल्हा आहे. जी पुण्यात परिस्थिती आहे, तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाहीय. वर्दीची भिती राहिलेली नाही. कोण आहे त्यांच्यामागे? सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत. याचा शोध घेण्याऐवजी राज्य सरकार मौन बाळगते असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, शिंदेसेनेच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले भाजपाचा मोर्चा काँग्रेस कार्यालयावर आला असता तर त्यांना ‘हू किल्ड करकरे’ पुस्तक भेट दिले असते.

काँग्रेसला देशभक्तीचे प्रमाणपत्र गद्दारसेनेने देण्याची गरज नाही. काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा आहे तर पाकिस्तान निर्मितीच्या विचाराला पाठबळ देणारा विचार भाजपा व रा. स्व. संघाचा आहे. स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची मोहम्मद अली जीन्नाच्या मुस्लीम लिगशी युती होती, त्या मुस्लीम लिगच्या सरकारमध्ये भाजपा नेते श्यामा …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ ऑगस्ट पासून एसटीच्या डिझेल खरेदीवर सवलत सुरू… तेल कंपन्यांनी सुरु केलेली सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबविणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करीत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी ०१.०८.२०२५ पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत (discount) देण्याचे आश्वासन दिले होते अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, त्यानुसार १ ऑगस्ट …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन, विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करावा समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वत:चा विकास साधताना समाजातील मागास घटकांना पुढे घेवून जाण्याचे महान विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांनी दिले असून या विचारांचा अंगिकार करत विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व विकासासाठी दादासाहेब गायकवाड,दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे,सदानंद फुलझेले यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून …

Read More »

कोल्हापूरकरांची उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी मान्य, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती उच्च न्यायालयाच्या चवथ्या खंडपीठाची स्थापना

मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून, १८ ऑगस्ट २०२५ पासून ते कार्यान्वित होईल. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ६ जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असणार …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रतिपादन, अदानी व अंबानींच्याच कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्याची गरज राष्ट्रीयकृत बँकांत परदेशी गुंतवणूक देशासाठी धोक्याची घंटा, बँकांचे दरवाजे सामान्य लोकांसाठी बंद होण्याच्या मार्गावर: विश्वास उटगी.

इंदिराजी गांधी यांनी १९६९ साली बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामागे एक महत्वाचे कारण होते. देशातील आर्थिक स्रोतांचा ताबा त्यावेळी मुठभर लोकांच्या हातात होता व ही शक्ती लोकशाहीवरही ताबा मिळवू पहात होती, यातून हा महत्वपूर्ण निर्णय झाला. आता पुन्हा ५६ वर्षांनी देशात एक नवी ईस्ट इंडिया कंपनी आली असून दोन भाईंचा …

Read More »

रामदास कदम यांच्या सावली डान्स बारचा परवाना परत केला अनिल परब यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा देताच पोलिसांची कारवाई

चोराने चोरलेला मुद्देमाल परत केला तरी कारवाई होणार, पण चोरी केलेल्या चोरावर काहीच कारवाई होत नसल्याचा घणाघात शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत केला. अनिल परब यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशात राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार असल्याचा आणि तो अद्यापही सुरु असल्याचा आरोप …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, भाजपा युती सरकार बेशरम व लाचार, राजीनामा न घेता क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच दहशतवादाला रंग देण्याचा भाजपाचा प्रयत्न, मालेगावचा खरा निकाल तर एक दिवस आधी गृहमंत्र्यांनी संसदेत दिला

राज्यातील भाजपा युती सरकार हे बेशरम व लाचार असून विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा सोडून क्रीडा मंत्रालय देऊन उचित सन्मानच केला आहे. आता रमी या खेळाला ऑलिंम्पिक दर्जा देतील व तो खेळणाऱ्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानितही करतील असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. लोकमान्य बाळ …

Read More »