राजकारण

अर्थसंकल्प म्हणजे जनतेच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देण्याचा प्रकार राज्यातील सर्व वर्गांना निराश करणारा असल्याची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी आज भाजप सरकारने सादर केलेला अर्थ संकल्प म्हणजे जनतेच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देण्याचा प्रकार असून राज्यातील सर्व वर्गांना निराश करणारा आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. हा अर्थसंकल्प होता की निवडणुकीचे प्रचाराचे भाषण होते अशी आम्हाला शंका आहे. अर्थसंकल्प मांडताना सुधीर मुनगंटीवार …

Read More »

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नैराश्याच्या खाईत ढकलणारा अर्थसंकल्प! विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प दुष्काळग्रस्तांना नैराश्याच्या खाईत ढकलणारा असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. अंतरिम अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये थेट आर्थिक मदत देण्याची गरज होती. खरीप २०१८ पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची आवश्यकता …

Read More »

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख, सुप्रसिद्ध संगीतकार भूपेन हजारीका यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे …

Read More »

छावण्या बंद…लावण्या सुरु विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

मुंबई : प्रतिनिधी छावण्या बंद… लावण्या सुरु… शेतकऱ्यांना मदत न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… मेगाभरती रद्द करणाऱ्या सरकारचा निषेध असो…छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम थांबणार्‍या सरकारचा धिक्कार असो… मोदी हटाव… देश बचाव… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी …

Read More »

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध करून द्या आयोगाने घेतला निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा

मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने राज्यातील निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा आज भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांनी आज येथे घेतला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कालपासून निवडणूक आयुक्त लवासा आणि चंद्रा राज्यातील यंत्रणांशी बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेत आहेत. उप निवडणूक आयुक्त  सुदीप …

Read More »

पाकिस्तानची हिम्मत होणार नाही इतकी कठोर कारवाई करा भारतीय हवाई दलाच्या जवानांनो भले शाब्बास! : खा. अशोक चव्हाण

मुंबईः प्रतिनिधी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून बेधडक हल्ला केला आणि दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. ही प्रत्येक भारतीयासाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. भारतीय सैनिकांचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे. या असामान्य शौर्याचे कौतुक करण्याकरिता शब्द अपुरे आहेत. परंतु हृदयातून भले शाब्बास हे उद्गार आपसूकच बाहेर पडत आहेत. अशा …

Read More »

कर्ण व मूकबधिरांसाठी सांकेतिक भाषा तज्ञ नियुक्त करणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी पुणे येथे कर्ण व मुकबधीर विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अखेर या प्रश्नी त्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्ण व मुकबधीर संघटनेचे पदाधिकारी आणि संबधित विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक आयोजित करून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत निर्णय …

Read More »

दहशतवाद्यांविरोधातील सर्जिकल स्ट्राईकचे विधिमंडळाकडून अभिनंदन मुख्यमंत्र्यांकडून सैन्य व वायुदलाचे विशेष अभिनंदन

मुंबई: प्रतिनिधी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेले चोख प्रत्युत्तर ही अभिमानाची बाब आहे.  सैन्य आणि वायू दलाने पाकव्याप्त काश्मिरमधील जैश- ए- मोहम्मदच्या तळांवर बॉम्बींग (air strike) करून ते नेस्तनाबुत केले आहे. जगातील मजबूत सैन्य आणि देशापैकी भारत एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले. या यशस्वी कामगिरीकरिता महाराष्ट्राच्यावतीने मुख्यमंत्री …

Read More »

सामना हे सरकारचे मुखपत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची उपरोधिक टीका

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्य जनतेला चांगले उपचार मिळावेत यासाठी आपण हजारो रूपये खर्च करतो. परंतु औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरें हे आर्शिवादाने रूग्ण बरे होत असल्याचे जाहीर वक्तव्य केले. त्यामुळे खैरेंच्या वक्तव्याची चौकशी करून जनतेच्या आरोग्यावार कोट्यावधींचा खर्च करण्याऐवजी खैरेंची मदत घेऊन आरोग्याचे सर्व प्रश्न सोडवावेत आणि त्यांच्या समाजसेवेचा आपण …

Read More »

आभाळ पडलय की पान हे नारायण राणे आणि शिवसेनेने पहावे माजी आमदार प्रमोद जठार यांचा उपरोधिक टोला

मुंबईः प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्प होणे गरजेचे असून या प्रकल्पामुळे कोकणातील लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र या गोष्टीचा विचार न करता वालमने उठविलेल्या हाळीवर नारायण राणे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोणाचा विरोध मोठा या स्पर्धेतून या प्रकल्पास विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नारायण राणे आणि …

Read More »