राजकारण

आरेतील कारशेडची जागा बदल्यास मेट्रोचे तिकिट महागणार भाजपा-शिवसेना युतीची घोषणा लवकरच -मुख्यमंत्री फडणवीस

मुंबईः प्रतिनिधी मुंबईत मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील काही जागा वापरण्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका पर्यायी जागेचा आग्रह धरला जात आहे. पण ती पर्यायी जागा मेट्रो कारशेडसाठी घ्यायची तर त्यासाठी पाच हजार कोटी रुपये द्यावे लागतील, परिणामी मेट्रोची आर्थिक व्यवहार्यता धोक्यात येईल आणि मेट्रोचे तिकिट मोठ्या प्रमाणावर वाढवावे लागेल अशी …

Read More »

काँग्रेस आणि राष्ट्रवादी २५० जागा लढविणार तर ३८ जागा मित्रपक्षांना आघाडीचा संयुक्त जाहिरनामा जाहीर करणार - प्रवक्ते नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप पूर्ण झालेले असून काँग्रेस १२५ आणि राष्ट्रवादी १२५ जागा लढविणार असून उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देत आघाडीचा संयुक्त जाहिरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार …

Read More »

२४ ऑक्टोबरला महाराष्ट्रात परिवर्तन झालेले असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आशावाद

मुंबईः प्रतिनिधी गेल्या सहा महिन्यात आर्थिक मंदीचे संकट वाढले आहे. बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी अडचणीत आले आहेत. आत्महत्या वाढल्या आहेत. एकंदरीत जनता हे सरकार बदलले पाहिजे, परिवर्तन झाले पाहिजे या मानसिकतेत आहे. त्यामुळे या निवडणुकीत २४ तारखेला निकाल येईल त्यावेळी महाराष्ट्रात परिवर्तन निश्चित होणार आहे असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

महायुतीतील महाराष्ट्र क्रांती सेना स्वतंत्र १०० जागा लढविणार ३० उमेदवारांची यादी जाहिर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेचे बिगूल वाजताच भाजपा-शिवसेनेचा घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने महायुतीतून फारकत घेत स्वतंत्रपणे १०० जागा लढविण्याची घोषणा क्रांती सेनेचे पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी केली. तसेच यातील पहिल्या ३० उमेदवारांची यादीही त्यांनी यावेळी जाहीर केली. चर्चगेट येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा-शिवसेनेकडून महायुतीत योग्य सन्मान …

Read More »

राज्यातील राजकिय पक्षांच्या दिवाळ-दिवाळीच्या मौसमाला सुरुवात निवडणूक आचारसंहिता लागू

नवी दिल्ली -मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधानसभेचा कालावधी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत असल्याने तत्पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य विधानसभेसाठी निवडणूकांची आचारसंहिता आजपासून लागू होत असून २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी यासाठी मतदार तर २४ ऑक्टोंबरला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने सत्तेत विराजमान होणारा राजकिय पक्ष दिवाळी साजरी …

Read More »

कर्जमाफीवर बोलणे म्हणजे फ्लॉप प्रवक्त्यांचे ‘फ्लॉप आरोप भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा काँग्रेस प्रवक्ते सावंत यांच्यावर पलटवार

मुंबईः प्रतिनिधी ८९ लाखांपैकी ५० टक्के शेतकर्‍यांनाच कर्जमाफी मिळाली असे म्हणणे म्हणणे फ्लॉप प्रवक्त्यांनी केलेले ‘फ्लॉप आरोप असल्याची टीका भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. गेल्या ५ वर्षांत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून एकही प्रभावी आरोप सचिन सावंतांना करता आलेला नाही. त्यामुळे नैराश्येतून अशी टीका त्यांच्या हातून होत असल्याचेही त्यांनी …

Read More »

मी बयान बहादूर नाही… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेनंतर उध्दव ठाकरे यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदीर उभारणीच्या अनुषंगाने कथित वक्तव्यांचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा थेट नामोल्लेख न करता बयान बहादूर आणि बडबोले अशी उपरोधिक टीका केली. या टीकेची दखल घेत उध्दव ठाकरे यांनी तातडीने मी हिंदू समाजाच्या भावना समोर ठेवल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न …

Read More »

यांचे निर्णय… यांची धोरणं चुकल्याने राज्य संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सरकारवर टीका

जालना: प्रतिनिधी आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे निर्णय आणि धोरणं चुकली आहेत त्यामुळे संपूर्ण राज्याला त्याचा फटका बसत आहे. राज्य मोठ्या संकटात आहे असं असताना यांना झोप तरी कशी लागते असा सवाल करतानाच यांना खरा आदेश देवून टाका असे जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जालना …

Read More »

मेक इन इंडियाच्या गप्पा मारणा-यांच्या काळात फक्त कुलूपांचे उत्पादन वाढले काँग्रेस प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांचा मोदी सरकारवर आरोप

मुंबईः प्रतिनिधी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात भयंकर मंदी आली आहे. कृषी, ऑटो उत्पादन क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांना मंदीचा मोठा फटका बसला असून लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशभरात हजारो लाखो कंपन्यांना टाळे लागले. मेक इन इंडियाच्या गप्पा मारणा-या भाजप सरकारच्या काळात फक्त कुलूप बनवणा-या कंपन्याचे उत्पादन वाढल्याचे दिसत असल्याची टीका …

Read More »

इतका खोटारडा पंतप्रधान देशातील जनतेने पाहिला नाही नवाब मलिक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान

मुंबई: प्रतिनिधी पवारसाहेब काय बोलले याचा अभ्यास न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत ते किती खोटारडे आहेत हे आज सिद्ध झाले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार …

Read More »