राज्य उत्पादन शुल्क विभागातील मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा दुय्यम निरिक्षक (गट -क) पदासाठी सध्या सुरु असणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करत दुय्यम निरीक्षकांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के जवानांमधून केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज …
Read More »आशिष शेलार यांची घोषणा, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी जयंत नारळीकर यांच्या नावे केंद्र जयंत नारळीकर यांच्या नावे विज्ञान व नाविण्यता उपक्रम केंद्र
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत (RGSTC) २०१५ पासून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये “विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र” (SIAC) स्थापन केले आहेत. आता उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये SIAC केंद्रे व २८ नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण ५ वर्षाच्या कालावधीत ही केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत, अशी घोषणा तंत्रज्ञान मंत्री …
Read More »अजित पवार यांचे आश्वासन, पंढरपूरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर विधानसभेत हेमंत रासने यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले आश्वासन
सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामांचा समावेश आहे.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर शहरातील २१३ सफाई कामगारांना प्रत्येकी ६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील. त्यासाठी ५५ कोटी ६१ लाख रुपयांचा …
Read More »उदय सामंत यांचे आश्वासन, ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी कायदा करणार विधान परिषदेतील लक्षवेधीला उत्तर देताना दिली माहिती
मुंबईमध्ये अनेक चाळी आणि वसाहतींचा पुनर्विकास होत आहे. या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवण्यात येते. या ट्रान्झिट कॅम्पचे भाडे तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत लवकरच कायदा करणार, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य शशिकांत शिंदे यांनी ताडवाडी येथील बीआयटी इमारतीच्या पुनर्वसन प्रकल्पाबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला …
Read More »उदय सामंत यांचे आश्वासन, गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जमीन संपादन एक तृतीयांश जमिन संपादनाच्या नियमांची अंमलबजावणी करणार
मुंबईतील गिरणी जमिनीसंदर्भात २०१९ पासून लागू असलेल्या नियमावलीनुसार (कलम ५८) आणि नवीन डीसीपीआर (कलम ३५) अंतर्गत, गिरणीच्या जागेचे तीन सम भाग करून त्यातील एक तृतीयांश (वन थर्ड) जमीन महानगरपालिकेस बगीचे व क्रीडांगणासाठी, एक तृतीयांश गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणि उर्वरित भाग मालकासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या नियमाची मुंबईत अंमलबजावणी सुरू …
Read More »आकाश फुंडकर यांची माहिती, कामगार विभागाच्या नव्या अभ्यासक्रमामुळे न्यायालयांवरील ताण कमी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेत "कायदेशीर चौकट व शिस्तव्यवस्थापन" प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात
कामगार विभागांतर्गत कार्यरत ना. में लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था या राज्यातील एकमेव शैक्षणिक संस्थेमार्फत, उद्योग व आस्थापनांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी Certificate Course in Legal Framework & Discipline Management या नव्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमामुळे उद्योग क्षेत्राला कायदेशीर बाबी आणि शिस्तव्यवस्थापन यामध्ये निपुण मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. परिणामी …
Read More »आनंदराज आंबेडकर यांची एकनाथ शिंदे युती दुर्दैवीः वंचित बहुजन आघाडीने केला निषेध वंचित बहुजन आघाडीने तातडीची बैठक घेत संविधानाला न मानणाऱ्यांबरोबर केली युती
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची शिवसेनाओएफसी आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांच्या आज युती झाल्याची घोषणा केली. त्यावर वंचित बहुजन आघाडीने तातडीने पक्षाची ऑनलाईन बैठक घेत या युतीचा निषेध करत ही युती दुर्दैवी असल्याचे मतही प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत करण्यात आले. …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाननुसार काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्रश्नावरील उत्तरा दरम्यान माहिती
सर्वोच्च न्यायालयाने २२ मे २०२५ रोजी आदेश पारित करून विदर्भातील झुडपी जंगल जमीन वन क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करीत झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेल्या नागरिकांना शासन बेघर होऊ देणार नाही, अशी ग्वाही विधानसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विदर्भातील सहा जिल्ह्यातील …
Read More »येमेन मधील दोन परकीय नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्यासंदर्भात चौकशी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातूल उलूम या धार्मिक शिक्षण संस्थेमध्ये येमेन देशातील दोन नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक गठीत करून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री(ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी …
Read More »स्थानिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची युती शिवसेना व रिपब्लिकन सेना यांची युती
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवा भिडू मिळाला आहे. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटासोबत प्रा.जोगेन्द्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची युती यापुर्वीच झाली असून आता आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना पक्षासोबत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. आज या …
Read More »
Marathi e-Batmya