विधिमंडळाच्या कामकाजात तसे पाह्यला गेले तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि कधी खडाजंगीमुळे वातावरण तप्त होते. तर कधी अनेकां आमदार, मंत्री किंवा दोन पक्षामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे विधिमंडळातील वातावरण क्षुब्ध पाहिल्याचे आपण अनेकांनी पाहिले असेल. मात्र रोजच्या कामकाजाच्या मानसिक गोंधळामुळे सत्ताधारी पक्षातील एक मंत्री दुसऱ्या सत्ताधारी …
Read More »ॲड प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, कर्नाटकात अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट आरक्षणावरून काँग्रेसवर आरोप
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर कर्नाटकात अनुसूचित जातींच्या (SC) संदर्भात बनावट सर्वेक्षण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमांवर एक्स x (ट्विटर) राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना टॅग करत, काँग्रेसवर अनुसूचित जातींना फसवण्याचा कट रचल्याचा प्रश्न विचारला आहे. त्यांनी थेट राहुल …
Read More »आशिष शेलार यांची ठाकरे बंधूवर टीका, एकाचं भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचं अप्रासंगिक महाराष्ट्रात कायदेशी राहणाऱ्याला कोणी कारण नाही
दोन भाऊ एकत्र झाले खूप छान झालं. दोन कुटुंब एकत्र झाली आम्हाला आनंदच आहे, कारण हिंदू जीवन पद्धती आणि हिंदू व्यवस्था यामध्ये कुटुंबाचं महत्त्व खूप आहे आणि हे मानणारी आमची विचारधारा आहे. त्यांच्या भाषणाबद्दल सांगायचंच झालं तर, एकाचं भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव, अशी टीका …
Read More »मतदारयाद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षते खालील समिती उपाय सुचवणार
विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विशेष पॉडकास्ट, महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…! ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत
‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी देखील आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वशंज नसलो, तरीही विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत. या सर्वांनी आपल्या ज्ञानाने, त्यागाने आणि धैर्याने हे राज्य घडविले. त्याला जपणे, वाढवणे आणि पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रधर्म …
Read More »मुख्यमंत्री यांचे विठ्ठलाला साकडे,…. संकटे दूर कर, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न
पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. …
Read More »राज ठाकरे यांचा इशारा, माझं एक आवाहन…तर असले व्हिडिओ बिडिओ काढू नका भाषा सक्ती कोणासाठी लहान मुलांसाठी, महाराष्ट्र मोठा आहे
राज्य सरकारने केलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी जनांकडून सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे अवघ्या मराठीजनांच्या विरोधामुळे अखेर राज्य सरकारने हिंदी सक्तीच्या मुद्यावरून माघार घेतली. तसेच हिंदी सक्तीचा निर्णय आणि त्रिसुत्री भाषेचा निर्णयही मागे घेतला. त्या निमित्त आयोजित विजयी मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. …
Read More »उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांना सवाल, पण मोदींची शाळा कोणती ? राज ठाकरे यांच्या सर्वांच्या शाळेच्या यादीवरून भाषणात दाद
हिंदी भाषेच्या सक्तीवरून मराठी जणांच्या लढ्यासमोर राज्य सरकारने माघार घेतली. त्या अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे आणि शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. तसेच अनेक मराठी बांधवही उपस्थित होते. या विजयी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी शिक्षणाचा …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा,… आता आम्ही दोघं तुम्हाला उचलून फेकून देणार गद्दार काल एका कार्यक्रमात जय गुजरात म्हणाले
मराठी जनांच्या लढ्यामुळे राज्य सरकारने हिंदी सक्तीवरून माघार घेतली. त्याप्रित्यर्थ्य आज मराठी जनांच्या लढ्याच्या विजयानिमित्त विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षानंतर या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आले. यावेळी सुरुवातीला राज ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी …
Read More »राज ठाकरे म्हणाले, मराठीसाठी एकत्र आलोय, तर उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती, एकत्र राहणार अनाजी पंताने आमच्यातील अंतरपाट काढला; जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांमुळे शक्य
राज्यातील हिंदी सक्तीवरून मुंबईसह राज्यातील तमाम मराठी जनांनी एकत्र येत राज्य सरकारच्या विरोधात लढा पुकारला. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील हिंदी सक्तीचा मुद्यापासून माघार घेत असल्याचे राज्य सरकारने जाहिर केले. त्यानंतर हिंदी भाषेच्या अनुषंगाने नव्याने एका समितीची स्थापना राज्य सरकारने केली. मात्र मराठी जणांच्या …
Read More »
Marathi e-Batmya