शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. काही प्रकल्पांच्या पुर्णत्वासाठी १८ वर्षानंतर निविदा प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने रखडलेले प्रकल्प पूर्ण करीत शेतीला कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी उमेद मॉल, महिलांसाठी न्यायालय यासह काही महत्वाचे निर्णय
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत उमेद मॉल, महिलासांठी न्यायालय, पिंपरी-चिंचवडसाठी न्यायालयासह, शेतकऱ्यांसाठी बाजारतळ, बोर आणि धाम येथील सिंचन प्रकल्प, महाराष्ट्र गोवा येथील वकीलांसाठी ठाण्यातील जमिन देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्य …
Read More »राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच या अभियानातील पुरस्कारांकरिता दरवर्षी २९० कोटी ३३ …
Read More »विश्वास उटगी यांचे आवाहन, बँकांचे खाजगीकरण करण्याचा मोदी सरकारचा डाव हाणून पाडा राष्ट्रीयकृत बँका वाचवण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार
इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य जनतेला बँकांचे दरवाजे खुले केले. या ऐतिहासिक घटनेला आज ५६ वर्ष झाली. पण आता मात्र केंद्रातील भाजपा सरकारची धोरणे राष्ट्रीयकृत बँकांच्या हिताची नाहीत. राष्ट्रीयकृत बँका भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, सर्वसामान्य जनता व समविचारी संघटनांनी मोदी सरकारचा हा प्रयत्न …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत खोटी माहिती संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? चीनचे नाव घेण्याची हिम्मत का होत नाही ?
ऑपरेशन सिंदूर विषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना अतिरेकी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख त्यांनी केला नाही. वाजपेयी सरकार असताना संसदेवर हल्ला झाला, अक्षरधाम हल्ला झाला आणि कंदहार विमान अपहरण प्रकरणी तर मंत्री जसवंत सिंह हे सुरक्षेसह पाच …
Read More »एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे मागणी, मतदार यादी आधारशी जोडा एक देश एक निवडणूक संकल्पनेला शिवसेनेचा पाठिंबा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडणे आणि मतदार यादीची छाननी करुन त्यातून बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना नेते उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे या शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली …
Read More »अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश, पिंपरी-चिंडवडमध्ये न्यायालय पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयासह वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाने आज मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या या निर्णयाला आज मूर्त स्वरूप मिळाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. उद्योग नगरी म्हणून ख्याती असणाऱ्या …
Read More »सुप्रिया सुळे यांचा आरोप, लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा, १४ हजार पुरुषांना लाभ लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा
महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे? १४ हजारांहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती छाननीमध्ये समोर आली आहे. प्रस्तुत घोटाळ्यासाठी संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असून, या घोटाळ्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे …
Read More »शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना जाहिर शासन निर्णय निर्गमित, पावसाळी अधिवेशनातील आश्वासनाची पूर्तता
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. डिजीटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी साधन असले तरी त्यातून गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे, तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन होवू नये याकरिता …
Read More »परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याशी संबध नाही ऑपरेशन सिंदूर प्रश्नी ट्रम्प यांच्या दाव्यावर विरोधकांच्या मागणीवर स्पष्ट
संसदेच्या अधिवेशनाला आज सकाळी पुन्हा एकदा सुरुवात झाली. यावेळी विरोधकांच्या मागणीप्रमाणे ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत २५ ते २६ वेळा भारत-पाकिस्तानचे युद्ध थांबविल्याबाबतचे दावा केला. त्यावरील केंद्र सरकारने खुलासा करावा अशी मागणी काँग्रेसचे उपनेते तरूण गोगाई यांनी या प्रस्तावावर बोलताना केली. त्यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्री …
Read More »
Marathi e-Batmya