मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉररुम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील १८ प्रकल्प आणि नवीन १५ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून, दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे काम व्हावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे …
Read More »पवन खेरा यांचा आरोप, ईडी ही मोदी-शाह यांची वसूली गँग, आरोपपत्राला भीक घालत नाही सोनिया गांधी व राहुल गांधींविरुद्ध ईडीने दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र एक राजकीय षड्यंत्र
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र हे एक राजकीय षड्यंत्र आहे. गांधी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून ईडी ही मोदी शाह यांची वसूली गँग आहे आणि त्यांच्या तथाकथित आरोपपत्राला काँग्रेस भिक घालत नाही, …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भ्रष्टाचारामुळेच महाराष्ट्र तहानलेलाच केंद्रीय अर्थमंत्रालयाने एका नळाचा खर्च ३० हजारावरून १ लाख ३७ हजारांवर कसा नेला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा …
Read More »नरहरी झिरवाळ यांचा इशारा, बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
बनावट पनीर किंवा चीज ऍनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले, पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, दडपशाहीचे राज्य, संविधान व अल्पसंख्यांकांना संपवण्याचे प्रयत्न आम्ही भारत जोडोवाले, कुटुंब फोडणारे नाही राज व उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच
देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून राज्य कारभार सुरु आहे. आज सर्व समाज घटक दबावाखाली, भितीखाली जगत आहे. सत्तेतील लोक घाबरवण्याचे काम करत आहेत. याला न डगमगता एकता व अखंडतेची मशाल हाती घेऊन पुढे जाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत दिलेल्या ‘डरो मत’ संदेश अंमलात आणू, …
Read More »संजय राऊत म्हणाले की, इकडे ही ठाकरे तिकडेही ठाकरे आम्ही सध्या… राज ठाकरे यांच्या आवाहनावर उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद शिवसेना उबाठाची मांडली भूमिका
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख आणि चुलत बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी कोणतेही वाद, भांडणं किरकोळ आहेत, तसेच एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार काही कठिण नाही. फक्त प्रश्न आहे तो इच्छेचा असे वक्तव्य करत ठाकरे बंधू एकत्र येण्याचे राजकिय संकेत दिले. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य घाटशीळ पारगाव येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्ताहासाठी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे ९३ व्या वर्षापासून सुरू आहे. या परंपरेच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. गहिनीनाथ गडाचा विकास करताना बीड जिल्ह्याला पाणीदार जिल्हा करणार …
Read More »राज यांच्या आवाहनावर उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्राच्या हिताआड येणाऱ्यांच्या पंगतीला नको आड येणाऱ्यांच्या घरी मी जाणार नाही, कोणाचे आगत स्वागत करणार नाही
नुकतेच राज ठाकरे यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टला मुलाखत देताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आमच्यातील वाद क्षुल्लक आहेत, पण महाराष्ट्र मोठा असल्याचे सांगत ते वाद, भांडणे महाराष्ट्रासाठी मिटवायला माझी तरी इच्छा आहे. पण माझ्या एकट्याच्या इच्छेचे काय समोरच्याची पण इच्छा असायला हवी असे सांगत शिवसेना उबाठाचे प्रमुख …
Read More »शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते वितरण शंकुतला खटावकर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्राने उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा तसेच क्रीडा क्षेत्रातही देशाचे नेतृत्व केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांना लहान वयापासूनच विविध क्रिडाप्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, डिफेन्स क्लस्टर करून उद्योजकांच्या क्षमतांना चालना द्यावी संरक्षण सामग्री उत्पादनांमध्ये देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
उद्योगासाठी उत्तम परिसंस्था असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक धाडसी व कल्पक आहेत. येथे डिफेन्स क्लस्टर तयार करून त्यांच्यातील क्षमतांना चालना द्यावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना केला. मराठवाडा:आत्मनिर्भर भारत की रक्षाभूमी’, याविषयावर चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अग्रीकल्चर तर्फे आयोजित चर्चासत्रात फडणवीस बोलत …
Read More »
Marathi e-Batmya