प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सवाल, भाजपाच्या दबावामुळे युतीपासून दूर राहतेय का? काँग्रेसकडून युतीचा हात पुढे करण्याकडे वंचित बहुजन आघाडीचे लक्ष

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे मी २१ मे रोजी स्पष्ट केले होते, तसेच माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनीही १८ जून रोजी त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती, असे आंबेडकरांनी सांगितले. मात्र, आजतागायत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने वंचित बहुजन आघाडीसोबत युतीसाठी कोणताही संपर्क साधलेला नाही, याबद्दल प्रकाश आंबेडकर यांची प्रश्न उपस्थित केला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपाने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत युती करू नये, असा दबाव आणला आहे का? भाजपाकडे काँग्रेसविषयी असे काय आहे, ज्यामुळे काँग्रेस भाजपाला घाबरत आहे? अशी प्रश्नांची सरबतीही यावेळी केली.

प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नवे चर्चासत्र रंगले असून, काँग्रेस आगामी निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युतीसाठी हात पुढे करणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांचे निर्देश, मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढा आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम, पदोन्नती आणि आश्वासित प्रगती योजनेसह विविध मागण्यांवर चर्चा

मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्यात यावा, तसेच प्रलंबित विषयांवर टप्प्याटप्प्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *