काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई आणि विधानसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलेल्या जोडे मारो आंदोलन करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही त्यावर चकार शब्द बोलू दिले नसल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ठाण मांडत तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर बसून हातात ‘लोकशाहीची हत्या’ असे फलक घेऊन हे मूक आंदोलन करण्यात आले.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून, भाजपने सूडबुद्धीने त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी तोंडाला काळी रिबीन बांधून पायऱ्यांवर मूक आंदोलन केले. pic.twitter.com/6uOUXyEbdU
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 25, 2023
Marathi e-Batmya