उत्तर प्रदेश पोलिसांनी वाईट वागणूक देवूनही राहुल गांधी म्हणाले….. वाचण्यासाठी क्लिक करा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना न घाबरण्याचा सल्ला

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

मृत दलित मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अशोभनीय वागणूक दिली. तसेच त्यांना १४४ कलमान्वये अटकही केली. तरीही राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतकेही घाबरू नये असा सल्ला दिला.

ते म्हणतात, युपी मे जंगलराज का ये आलम है की, शोक में डुबे परिवार से मिलना भी सरकार को डरा देता है, इतना मत डरो, मुख्यमंत्री महोदय.

असे म्हणत त्यांच्या भीत्रेपणावर नेमके पणाने बोट ठेवले.

राहुल गांधी यांच्या आजच्या यापवित्र्यामुळे संबध देशातील राजकिय वर्तुळात खळबळ उडाली असून दलित मुलीवरील बलात्कार आणि मृत्यूचे प्रकरण दाबण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांचे आश्वासन, २०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार एसटी महामंडळाने ५,१५० इलेक्ट्रिक बस घेण्याचा करार

पर्यावरणपूरक, आधुनिक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा संपूर्ण बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *