इराणचे सर्वोच्च नेते तथा आणि मूळचे भारतीय असलेले अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल भारताने आज अखेर शोक व्यक्त केला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारत सरकारच्या वतीने इराणी दूतावासात शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली.
विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणी राजदूताला सहानुभूतीचा संदेश देखील दिला.
परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) जारी केलेल्या छायाचित्रात परराष्ट्र सचिव भारतातील इराणी राजदूत मोहम्मद फताली यांच्याशी संभाषण करताना दिसत आहेत.
मागील अनेक वर्षापासून इराण आणि भारताचे सौहार्दाचे संबध असतानाही आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण होत आहे. मात्र अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याने इराणवर केलेल्या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाले. पंरतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधऩाबद्दल साधा शोकही व्यक्त केला नाही. त्यामुळे मोदी सरकारला या संबधाची जाणीव व्हावी यासाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी इराण-भारत राजकीय संबधाबाबत लेख लिहून मोदी सरकारला जाणीव करून दिली. त्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणी राजदूत मोहम्मद फताली यांची भेट घेऊन शोक व्यक्त केला.
Foreign Secretary Shri Vikram Misri visited the Embassy of the Islamic Republic of Iran and signed the condolence book, on behalf of the people and the Government of India, on the demise of Supreme Leader Ayatollah Syed Ali Khamenei. pic.twitter.com/lOODHeI5fm
— Randhir Jaiswal (@MEAIndia) March 5, 2026
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या परिस्थितीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे इराणी समकक्ष सय्यद अब्बास अरघची यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. “आज दुपारी इराणी परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली,” असे त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. चर्चेत काय झाले हे लगेच कळू शकलेले नाही.
२८ फेब्रुवारी रोजी संघर्षाच्या सुरुवातीला अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात खामेनी आणि त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्य, त्यांची लहान नात आणि त्यांचे वरिष्ठ सल्लागार यांचा मृत्यू झाला.
भारताने पश्चिम आशियातील संकट संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याचे आवाहन केले असले तरी, खामेनी यांच्या हत्येवर प्रतिक्रिया न देण्याचे निवडले. परराष्ट्रमंत्री (EAM) एस. जयशंकर यांनी २८ फेब्रुवारी रोजी त्यांचे इराणी समकक्ष सय्यद अब्बास अरघची यांच्याशी चर्चा केली, तथापि, शोक संदेशाच्या कोणत्याही वाचनात किंवा तेहरानच्या मध्यभागी झालेल्या हल्ल्यांच्या निषेधात कोणताही उल्लेख नव्हता.
खामेनींच्या हत्येबद्दल केंद्र सरकारच्या मौनामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली होती, त्यामुळे मिस्री यांनी इराणी दूतावासाला भेट दिली आणि शोकपुस्तकावर स्वाक्षरी केली हे महत्त्वाचे ठरले.
Marathi e-Batmya