राजनाथ सिंह यांचा इशारा, पडद्यामागे असलेल्यांपर्यंतही पोहचू… सूचक शब्दात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा

काश्मीरच्या पहलगाममधील भयंकर दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या लोकांना “नजीकच्या भविष्यात” जोरदार प्रत्युत्तर मिळेल आणि अशा कोणत्याही दहशतवादी कारवायांमुळे भारताला “भयभीत” करता येणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन कुरणात भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गटावर गोळीबार केला, ज्यात दोन परदेशी लोकांसह २६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, “या व्यासपीठावरून, मी देशवासियांना आश्वासन देतो की या घटनेच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार आवश्यक आणि योग्य ते सर्व पाऊल उचलेल,” असे आश्वासनही यावेळी दिले.

पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “आणि ज्यांनी ही घटना घडवली त्यांना आम्ही शोधून काढणार नाही, तर पडद्यामागे बसून भारताच्या भूमीवर हे नृशंस कृत्य करण्याचा कट रचणाऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचू” असा इशाराही यावेळी दिला.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “भारत ही इतकी जुनी सभ्यता आणि एवढा मोठा देश आहे की त्याला अशा कोणत्याही दहशतवादी कारवायांमुळे घाबरवता येणार नाही.” “अशा कृत्यांसाठी जबाबदार असलेल्या लोकांना नजीकच्या काळात जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल,” असेही ठामपणे सांगितले.

“आम्ही दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकजूट आहोत आणि भारताचे (दहशतवादासाठी) शून्य-सहिष्णुतेचे धोरण आहे. आम्ही प्रत्येक आवश्यक आणि योग्य पाऊल उचलू,” असेही ते पुढे म्हणाले.

दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान घेतल्यानंतर लगेचच राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केले.

सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि एअर चीफ मार्शल एके सिंह उपस्थित होते.

बैठकीदरम्यान, राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांना त्यांची लढाऊ तयारी वाढवण्याचे आणि खोऱ्यातील दहशतवादविरोधी कारवायांची तीव्रता वाढवण्याचे निर्देश दिले, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली.

२२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता पहलगाममधील नयनरम्य बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी नागरिकांवर गोळीबार केल्यापासून जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर अनेक बैठका झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुन्हेगारांना सोडले जाणार नाही आणि त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे.

“त्यांना (दहशतवाद्यांना) सोडले जाणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाशी लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल,” असे पंतप्रधान मोदींनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे.

About Editor

Check Also

ईडीची मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव तपासात अडथळा आणल्याचा आरोप करत दाखल केली याचिका

सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने अर्थाने ईडी सर्वोच्च न्यायालयात कलम ३२ नुसार याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *